शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘एसटी’च्या 3500 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामच नाही, हजेरी भरणे बंद; ‘काम नाही, तर दाम नाही’ने अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 12:23 IST

ST Bus: कोरोना निर्बंध शिथिल झाले असले तरी एसटीला अद्यापही अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत. बसफेऱ्या कमी होत आहेत आणि काही गाड्या ऐनवेळी रद्दही होत आहेत.

- विलास गावंडे यवतमाळ : कोरोना निर्बंध शिथिल झाले असले तरी एसटीला अद्यापही अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत. बसफेऱ्या कमी होत आहेत आणि काही गाड्या ऐनवेळी रद्दही होत आहेत. याचा फटका रोजंदारी कर्मचाऱ्यांना बसत आहे. काही कर्मचाऱ्यांची हजेरी भरणे थांबविण्यात आले आहे. ‘काम नाही, तर दाम नाही’ हे एसटीचे धोरण आहे. यामुळे राज्यातील ३५०० रोजंदारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

कोरोनाच्या आधी एसटीचे दररोजचे उत्पन्न २२ कोटी रुपये इतके होते. आज आठ ते दहा कोटींच्या घरातच आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शहरातील प्रतिष्ठाने लवकर बंद होतात. त्यामुळे नागरिक प्रवास करणे टाळतात. यामुळे बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. सुरू फेऱ्यांवर प्रथम एसटीच्या कायम कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. यानंतर रोजंदार गट क्र. २ आणि नंतर रोजंदार गट क्र. १च्या चालक-वाहकांना पाठविले जाते.

आता काही ठिकाणी रोजंदार गट क्र. १च्या अर्थात महामंडळात नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कामगिरी देणे थांबविले आहे. पुढील काही दिवसात ही गती वाढण्याचे संकेत आहेत. राज्यात ३५०० रोजंदार गट क्र. १ कामगार आहेत. ते २०१८-१९ च्या भरती प्रक्रियेत महामंडळाच्या सेवेत दाखल झाले आहेत. सुरुवातीपासूनच त्यांना कामगिरी मिळण्यात अडथळे येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच त्यांना कामगिरीसाठी भांडावे लागत आहे. आता पुन्हा त्यांच्यावर संकट आले आहे. 

प्रवासी संख्या कमी असल्याने बसफेऱ्यांवर परिणाम झाला आहे. गरजेनुसार कर्मचाऱ्यांना संधी दिली जात आहे. पुढील काळात तसेच शाळा सुरू झाल्यानंतर फेऱ्या वाढतील. त्यावेळी पुन्हा कामाची संधी मिळेल.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ 

लॉकडाऊनमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ऑनड्यूटी समजून वेतन देण्यात येईल, असे शासनाचे परिपत्रक आहे. कामगिरी मिळो किंवा न मिळो सर्वांना वेतन मिळाले पाहिजे.श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस 

...तर आर्थिक गणित कोलमडणारnकोरोनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारास विलंब होण्याची शक्यता आहे. जर पगारास विलंब झाला, तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोसळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :state transportएसटीMaharashtraमहाराष्ट्र