शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

४ वर्षांत ३.३६ लाख कोटींची गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:56 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपालांचे अभिभाषण : राज्य सरकारच्या योजनांचा मांडला लेखाजोखा

मुंबई : राज्यात राबविलेली उद्योगभिमुख धोरणे, मेक इन इंडियांतर्गत मॅग्नेटिक महाराष्ट्रचे आयोजन या द्वारे गेल्या चार वर्षांत ३.३६ लाख कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषणात सांगितले.

राज्यपाल म्हणाले की, भारतात होणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी जास्तीत जास्त थेट गुंतवणूक मिळविण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिले आहे. माहिती तंत्रज्ञान धोरण, इलेक्ट्रॉनिक्स धोरण, संरक्षण व अंतराळ धोरण यांसारख्या धोरणांच्या परिणामी राज्यात १४ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा असून त्यातून सुमारे १.१५ लाख इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. या अभिभाषणात राज्यपालांनी ४ वर्षांत राज्य सरकारच्या माध्यमातून चौफेर विकास झाल्याचे सांगत त्याचा आलेख मांडला.दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे सांगत त्यांनी या संबंधी केलेल्या अनेक उपाययोजनांचा उल्लेख केला. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, हमीभावाने धान्याची केलेली विक्रमी खरेदी, शेतकऱ्यांना कांद्यावर क्विंटलमागे दिलेले २०० रुपयांचे अनुदान, गेल्या चार वर्षांत दीड लाखांहून अधिक विहिरींचे बांधकाम केले, ५० हजार विहिरींचे काम सुरु असणे, १.३० लाख शेततळी बांधून पूर्ण करणे या उपलब्धींकडे त्यांनी लक्ष वेधले.

मे २०१९ पर्यंत सुमारे २२ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत राज्यातील २६ प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होवून ५.५६ लाख हेक्टर अधिकची सिंचन क्षमता निर्माण होईल. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे सरकारचे लक्ष्य असून ते साध्य करण्यासाठी आमदार, सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्लास्टिक बंदीचा निर्णय, मुंबईसह राज्यात उभारलेले पायाभूत सुविधांचे प्रचंड जाळे, विविध समाजांसाठी असलेल्या महामंडळांना दिलेले आर्थिक पाठबळ, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सामान्यांचा वाढविलेला सहभाग आदी उपलब्धींचाही त्यांनी उल्लेख केला.धनगर, परीट आदी समाजांनाही आरक्षणमराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देऊन आणि खुल्या प्रवर्गास १० टक्के आरक्षण देऊन वचनांची पूर्तता केलेली आहे. धनगर, वडार, परीट, कुंभार, कोळी यांसारख्या वंचित समाजांच्या आरक्षणाच्या मागण्यादेखील वेळेत पूर्ण करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे राज्यपाल म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र