शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या ३३% जागा अद्याप रिकाम्याच; सध्याची सभागृहाची परिस्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 06:51 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याची झळ, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण संख्याबळ ७८ इतके आहे, त्यातील २६ जागा आजमितीस रिक्त आहेत. हे ज्येष्ठांचे सभागृह ३३ टक्के रिकामे असल्याचे चित्र सध्यातरी बदलण्याची शक्यता नाही. 

विक्रांत पाटील, चित्रा वाघ, बाबूसिंग राठोड (भाजप), हेमंत पाटील, मनीषा कायंदे (शिंदेसेना), पंकज भुजबळ, इद्रिस नायकवाडी (अजित पवार गट) अशा सातजणांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर आधीच पाठविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

राज्यपाल नियुक्त आमदारांची एकूण संख्या १२ असते. पाच जागा अजूनही रिक्त आहेत आणि त्या लगेच भरण्यासाठी महायुतीमध्ये सध्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. भविष्यात या पाच जागा भरताना भाजपला तीन आणि अन्य दोन मित्रपक्षांना प्रत्येकी एक अशा जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. 

सदस्यांतून आमदार निवडून पाठविण्याचाही खोळंबा

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत सुरू होत असून, या अधिवेशनातही विधान परिषदेचे संख्याबळ हे एकूण संख्येच्या दोन तृतियांश इतकेच असेल. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या २२ पैकी तब्बल १६ जागा सध्या रिक्त आहेत. जवळपास तीन वर्षांपासून बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या सदस्यांमधून विधान परिषदेवर आमदार निवडून पाठविण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. या निवडणुका झाल्यानंतरच विधान परिषदेवर सदस्य निवडून देण्यासाठीची निवडणूक होईल. 

अशी आहे विधान परिषदेची स्थिती 

मतदारसंघाचे नाव एकूण जागाभरलेल्या जागारिक्त जागा
विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित३०२५०५
स्था. स्व. संस्थांद्वारे निर्वाचित२२०६१६
पदवीधर मतदारसंघांमधून निर्वाचित ०७०७
शिक्षक मतदारसंघामधून निर्वाचित०७०७
राज्यपाल नामनियुक्त१२०७०५

 

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMahayutiमहायुतीBJPभाजपा