शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

31 ऑक्टोबरपासून काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन, अहमदनगरमधून होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 15:10 IST

सरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

ठळक मुद्देसरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.सरकारविरोधात 31 ऑक्टोबरपासून काँग्रेसकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. जनआक्रोश आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं आहे.

मुंबई-  सरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासाठी सरकारविरोधात 31 ऑक्टोबरपासून काँग्रेसकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. जनआक्रोश आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं आहे. 31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी अहमदनगर जिल्ह्यातून जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात होणार आहे. तर सांगलीत विराट जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलनाची सांगता करण्यात येईल. मुंबईत राधाकृष्ण पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलत होते. 

नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला असून देशाचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नोटबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होतं आहे. त्याचदिवशी काळा दिवस पाळणार असल्याचंही अशोक चव्हाण यांनी म्हंटलं. कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ असून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलं नाही. अटी शर्ती घालून शेतक-यांना कर्जमाफीतून वगळलं आहे. राज्यात कर्जमाफीचा सावळा गोंधळ सुरु असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली आहे. २००८-०९ च्या कर्जमाफीत गैरव्यवहाराचा आरोप चुकीचा आहे. सरकारला त्याची आता आठवण का येतेय? तेव्हा विरोधक म्हणून हे काय करत आहे, असा सवालही अशोक चव्हाण यांनी विचारला. कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीच्या सक्तीची अट तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे. 

अशोक चव्हाण यांनी आधार कार्डाच्या सक्तीवरूनही सरकारवर टीता केली आहे. आधार कार्डाची सक्ती राज्य सरकारने केली. बँकांनी ही सक्ती केली नव्हती. कमीतकमी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हेतूनेच तारीख पे तारीख आणि नवनवीन नियमांचा घाट घातला गेल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हंटलं. राज्यात सत्तेत बसलेल्या नेत्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. त्याच्यावर पकड नाही. एका दिवसात वीस वीस जीआर निघतायत. त्यामुळे हे सरकार घालवायला हवं. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असंही अशोक चव्हाण यांनी म्हंटलं.

सरकारने अपमानास्पद वागणूक दिलीइतिहासात कधी नाही एवढी अपमानास्पद वागणूक या सरकारने दिली असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी म्हंटलं. स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना इतकी अपमानास्पद वागणूक कधी मिळाली नाही. शेतक-यांचा आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांचा फुटबॉल झाला आणि हे मात्र फिफा खेळत बसलेस असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. 

कर्जमाफीच्या यादीत आलेल्या बोगस नावांची चौकशी कराकर्जमाफीच्या यादीत आलेल्या बोगस नावाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.  

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा