प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत
By Admin | Updated: July 17, 2017 20:01 IST2017-07-17T20:01:51+5:302017-07-17T20:01:51+5:30
खरीप हंगामात राज्यातील सर्व जिल्हयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ जुलै २०१७ आहे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३१ जुलै अंतिम मुदत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : खरीप हंगामात राज्यातील सर्व जिल्हयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ जुलै २०१७ आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.
कृषिमंत्री म्हणाले की, योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेतील सहभाग निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करावी . अंतिम मुदतीच्या दिनांकापूर्वी ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी होणार नाही त्यांना योजनेत सहभागी होता येणार नाही. मुदतीच्या शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता त्यापूर्वीच शेतकऱ्यांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा.
शेतकऱ्यांनी तत्काळ आवश्यक त्या कागदपत्रांसह आपल्या जवळच्या बँक शाखेत किंवा ैआपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करावी. योजनेच्या नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी देखील संपर्क साधता येईल, अशी माहिती देखील कृषिमंत्र्यांनी यावेळी दिली.