शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
4
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
5
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
9
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
10
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
11
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
12
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
13
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
14
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
15
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
16
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
17
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
18
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
19
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
20
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

राज्यात आढळले उष्माघाताचे ३०३ रुग्ण, सात जणांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:50 AM

राज्यासह मुंबईत उन्हाचा पारा दिवसागणिक चढतो आहे, त्यामुळे नागरिक त्रासले आहेत.

मुंबई : राज्यासह मुंबईत उन्हाचा पारा दिवसागणिक चढतो आहे, त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. परिणामी, राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये १५ मार्च ते ५ मे या काळात ३०३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उष्माघात नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, राज्यात सात जणांचा उष्माघाताने बळी गेला आहे. यात हिंगोलीमध्ये दोघांचा बळी गेला असून बीड, परभणी आणि धुळे येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू ओढावला आहे.उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण अकोल्यात असून त्यांची संख्या १३८ एवढी आहे. तर नागपूरमध्ये ११२ , लातूरमध्ये ४१, नाशिक आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकी सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या परभणी आणि जालन्यात तापमान ४२ अंशांवर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.उन्हाच्या चटक्यामुळे जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यांत वेदना येणे अथवा रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन होणे यासारखी लक्षणे दिसतात. त्यावर राज्याच्या आरोग्य विभागाने सरकारी रुग्णालयांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, असे राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी सांगितले. राज्यातील सर्व सरकारी जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करावा. त्या वॉर्डात वातानुकूलित यंत्रणा लावावी. जेणेकरून तो संपूर्ण वॉर्ड थंड राहिला पाहिजे. त्यामुळे उष्णाघाताच्या रुग्णाला त्या ठिकाणी दाखल करून त्याच्यावर उपचार करणे शक्य होईल. उष्माघाताचा रुग्ण आल्यास त्याला वातानुकूलित खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कूलर लावावेत, अशा सूचनादेखील देण्यात आल्याचेही डॉ. भोई यांनी सांगितले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्र