शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

भेसळयुक्त पदार्थांचा ३० हजार किलोचा साठा जप्त , सप्टेंबर महिन्यातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:40 AM

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईसह राज्यभरातून अन्न व औषध प्रशासन विभागाने खवा, मावा, मिठाई, वनस्पती तेल-तूप अशा विविध भेसळ असलेल्या पदार्थांचा तब्बल ३० हजार ४४९ किलोचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहून भेसळखोरांपासून सावध राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत, दिवाळीच्या फराळांची मनसोक्त लज्जत चाखली जाते. या कालावधीत फराळासाठी मावायुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने, याचा फायदा घेत विक्रेते भेसळ करतात. त्यातून विषबाधेसारखे प्रकार घडतात. राज्य व राज्याबाहेरून आणण्यात येणाºया मावायुक्त पदार्थांवर नजर ठेवण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून विशेष मोहीम राबविली जाते. दिवाळीनिमित्त शहरात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांसाठी तूप, तेल, दुग्धपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी भेसळयुक्त माल बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांपासून मिठाई तयार करण्यासाठी खवा, तसेच वनस्पती तुपाची मागणी वाढली आहे.दिवाळीपूर्वी काही दिवस अगोदर व दिवाळीच्या कालावधीत ही मोहीम राबविली जाते. सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ८२२ भेसळयुक्त पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत.एफडीएच्या विशेष भरारी पथकाकडून ही कारवाई केली जाते. महत्त्वाची रेल्वे स्थानके व जेथे मालाची ने-आण केली जाते, अशा ठिकाणी विशेष नजर असते, असे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) मुख्यालय चंद्रशेखर साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :diwaliदिवाळी