शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

"३० आमदारांचा मला पाठिंबा..."; काँग्रेस आमदारानं थेट हायकमांडला लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 11:30 IST

विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी त्यांच्या सहकारी ८ आमदारांसह राज्य सरकारला पाठिंबा दिला

मुंबई – राज्यातील राजकारणात गेल्या ४ वर्षापासून अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना यांच्यात बिनसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार यांनी बंड करत उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्याकडून पक्षच घेण्याची चाल आखली. गेल्या वर्षभरात शिवसेना-राष्ट्रवादी फुटल्याने विधानसभेत आमदारांचे संख्याबळ घटले. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा सांगितला आहे.

विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु काँग्रेस पक्षातच विरोधी पक्षनेतेपदावरून चुरस निर्माण झाली आहे. त्यात आता काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी थेट दिल्लीला पत्र पाठवल्याचे समोर आले आहे. या पत्रात ३० आमदारांचा मला पाठिंबा असल्याचे थोपटे यांनी दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरुवातीला काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांची नावे आघाडीवर होती. त्यानंतर गेल्या २ दिवसांपासून काँग्रेस दुसऱ्या फळीतील नेतृत्व पुढे आणण्याची शक्यता असल्याचे बोलले गेले. त्यात अनेक नावे चर्चेत आहेत.

संग्राम थोपटे यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असून मी विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज विधानसभेत बैठक होणार आहे. त्यामुळे आज या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी संग्राम थोपटे यांनी पाठवलेल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काय निर्णय घेणार हेदेखील पाहावे लागणार आहे असं वृत्त एबीपीने दिले आहे.

याआधी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी त्यांच्या सहकारी ८ आमदारांसह राज्य सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाच शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या ८ नेत्यांची सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागली. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत २ गट पडले. त्यात शरद पवारांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या घटली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ४० आमदार असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटले. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला.

टॅग्स :congressकाँग्रेसAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा