शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कृषी विभाग घेणार ३ लाख शेतकऱ्यांची शाळा             

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 20:46 IST

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांची मशागतपूर्व, लागवडीनंतर व वाढीदरम्यान काळजी कशी घ्यावी, शेतमालाचे प्रतवारीकरण, पॅकेजिंग कसे असावे या विषयी राज्यातील तब्बल ३ लाख शेतकऱ्यांची कृषी विभाग शाळा घेणार आहे.

पुणे : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांची मशागतपूर्व, लागवडीनंतर व वाढीदरम्यान काळजी कशी घ्यावी, शेतमालाचे प्रतवारीकरण, पॅकेजिंग कसे असावे या विषयी राज्यातील तब्बल ३ लाख शेतकऱ्यांची कृषी विभाग शाळा घेणार आहे. सोयाबीन, भात, कापूस, तूर, मका, ज्वारी व हरभरा या पिकांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली. 

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी साखर संकुल येथे कृषी विभागाची आढावा बैठक झाली. त्यात शेतकरी शेती शाळेचे नियोजन केले. राज्यातील १२ हजार गावांमध्ये येत्या खरीप हंगामापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या गावांमधील प्रत्येकी २५ शेतकऱ्यांची या उपक्रमा अंतर्गत निवड करण्यात येईल. त्यात प्रयोगशील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागा अंतर्गत असलेले सर्व उपविभाग एकत्रित येऊन एक मोहीम म्हणून ही योजना राबविणार आहेत. 

कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतकरी शेतीशाळा घेण्यात येईल. पेरणीपूर्व घ्यायची दक्षता, जमीनीची मशागत, बियाणांची निवड, लागवड कालावधी, जमिनीच्या सुपिकता निर्देशांका प्रमाणे खतांचा वापर, पिकाची वाढीची अवस्था, कीड रोग नियंत्रण व्यवस्थापन याची माहिती दिली जाईल. या शिवाय शेतमालाचे , पॅकेजिंग याबाबतही शेतकºयांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर या शेतकºयांनी आपल्या गावातील इतर शेतकºयांना प्रशिक्षित करणे अपेक्षित आहे. 

या मोहीमेसाठी राज्य आणि विभागस्तरावर समन्वयकांची नेमणूक केली असून, त्यांना २ हजार क्षेत्रिय अधिकारी आणि कर्मचारी व राज्यातील २० हजार शेतकरी मित्र मदत करतील. तसेच, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र व पुरस्कार प्राप्त शेतकºयांचाही यात सहभाग असणार आहे. विकास शेती शाळेच्या प्रशिक्षण, प्रसिद्धीसाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीEducationशिक्षण