शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई; प्रत्येक मतदान केंद्रावर असतील १० मिलीच्या दोन बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 08:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आता प्रचार-प्रसाराला वेग येईल.

संतोष आंधळे/दीपक भातुसे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आता प्रचार-प्रसाराला वेग येईल. जसजसे मतदानाचे टप्पे पुढे सरकत जातील तसतसा प्रचार शिगेला पोहोचेल. रंगत वाढत जाईल. विविध रंगांच्या झेंड्यांच्या गर्दीत बोटावर लावलेली शाई अधिक उठून दिसेल. तीच मतदाराची शक्ती. पाच वर्षांतून एकदा वापरता येणारी. या शाईला अनन्यसाधारण महत्त्व असून, राज्यभरात तब्बल दोन हजार लिटर शाई लागणार आहे.

निवडणुकीत मतदान केले की मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे, हे दर्शवणारी ती शाई. या शाईची निर्मिती कर्नाटकातील एका कंपनीकडून केली जाते. राज्यभरातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ९७ हजार ३२५ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, या मतदारसंघांमध्ये ही शाई उपलब्ध राहणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेत ही माहिती नमूद असून आयोगात सूत्रांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

आणखी ७८० मतदार संघ

राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सध्याच्या एकूण मतदान केंद्रांव्यतिरिक्त आणखी ७८० मतदार केंद्रे वाढवून द्यावीत अशी मागणी केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवमतदारांमध्ये उत्सुकता

  • आपल्या बोटावर लागलेल्या शाईचा फोटो मतदारांकडून समाजमाध्यमांवर प्रसारित केला जातो. त्यातही नवमतदार याबाबत अधिक उत्सुक असतात.
  • वलयांकित व्यक्तीही मतदान केल्याचे दर्शविण्यासाठी समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करत असतात. ही शाई इंडेलिबल इंक म्हणून प्रसिद्ध आहे.
  • सुरुवातीला जांभळी वाटणारी शाई बोटाला लावल्यानंतर काळी पडते. 
  • एकदा ही शाई बोटावर लावली की काही सेकंदातच ती तत्काळ सुकते. त्याशिवाय ही शाई कुठल्याही रसायने, साबणाने पुसली जात नाही. 

प्रमाण कसे?

प्रत्येक मतदान केंद्रावर १० मिलीची एक अशा दोन शाईच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. मतदानाची प्रक्रिया पार पडली की ती बोटाला लावली जाते. राज्यातील मतदान केंद्रांच्या संख्येचा विचार केल्यास राज्यभरात सातही टप्प्यांसाठी १ हजार ९४६ लिटर शाईची गरज भासणार आहे. त्याशिवाय राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काही वाढीव मतदारसंघांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तो आकडा ग्राह्य धरून जवळपास २००० लिटर शाई या निवडणुकीत राज्यात मतदारांच्या बोटाला लागणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maharashtraमहाराष्ट्रVotingमतदानElectionनिवडणूक