शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मतदारांसाठी लागणार 2000 लिटर शाई; प्रत्येक मतदान केंद्रावर असतील १० मिलीच्या दोन बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 08:55 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आता प्रचार-प्रसाराला वेग येईल.

संतोष आंधळे/दीपक भातुसे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र आता प्रचार-प्रसाराला वेग येईल. जसजसे मतदानाचे टप्पे पुढे सरकत जातील तसतसा प्रचार शिगेला पोहोचेल. रंगत वाढत जाईल. विविध रंगांच्या झेंड्यांच्या गर्दीत बोटावर लावलेली शाई अधिक उठून दिसेल. तीच मतदाराची शक्ती. पाच वर्षांतून एकदा वापरता येणारी. या शाईला अनन्यसाधारण महत्त्व असून, राज्यभरात तब्बल दोन हजार लिटर शाई लागणार आहे.

निवडणुकीत मतदान केले की मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे, हे दर्शवणारी ती शाई. या शाईची निर्मिती कर्नाटकातील एका कंपनीकडून केली जाते. राज्यभरातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ९७ हजार ३२५ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून, या मतदारसंघांमध्ये ही शाई उपलब्ध राहणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेत ही माहिती नमूद असून आयोगात सूत्रांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

आणखी ७८० मतदार संघ

राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सध्याच्या एकूण मतदान केंद्रांव्यतिरिक्त आणखी ७८० मतदार केंद्रे वाढवून द्यावीत अशी मागणी केली आहे. त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवमतदारांमध्ये उत्सुकता

  • आपल्या बोटावर लागलेल्या शाईचा फोटो मतदारांकडून समाजमाध्यमांवर प्रसारित केला जातो. त्यातही नवमतदार याबाबत अधिक उत्सुक असतात.
  • वलयांकित व्यक्तीही मतदान केल्याचे दर्शविण्यासाठी समाजमाध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करत असतात. ही शाई इंडेलिबल इंक म्हणून प्रसिद्ध आहे.
  • सुरुवातीला जांभळी वाटणारी शाई बोटाला लावल्यानंतर काळी पडते. 
  • एकदा ही शाई बोटावर लावली की काही सेकंदातच ती तत्काळ सुकते. त्याशिवाय ही शाई कुठल्याही रसायने, साबणाने पुसली जात नाही. 

प्रमाण कसे?

प्रत्येक मतदान केंद्रावर १० मिलीची एक अशा दोन शाईच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. मतदानाची प्रक्रिया पार पडली की ती बोटाला लावली जाते. राज्यातील मतदान केंद्रांच्या संख्येचा विचार केल्यास राज्यभरात सातही टप्प्यांसाठी १ हजार ९४६ लिटर शाईची गरज भासणार आहे. त्याशिवाय राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काही वाढीव मतदारसंघांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तो आकडा ग्राह्य धरून जवळपास २००० लिटर शाई या निवडणुकीत राज्यात मतदारांच्या बोटाला लागणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Maharashtraमहाराष्ट्रVotingमतदानElectionनिवडणूक