शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

टोमॅटोचा किरकोळ बाजारात दर २०० वर; चमक आणखी वाढली

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 30, 2023 19:52 IST

किरकोळमध्ये २०० रुपये : ७ ट्रकची आवक; अन्य भाज्या उतरल्या

नागपूर : काही दिवसांआधी कमी झालेली टोमॅटोची चमक आणखी वाढली आहे. किरकोळमध्ये १४० रुपयांपर्यंत कमी झालेले भाव पुन्हा २०० रुपयांवर पोहोचले आहेत. सध्या तरी टोमॅटो गृहिणींच्या स्वयंपाकघराचा भाग राहिलेला नाही. आवक सुरुळीत झाल्यानंतर भाव कमी होण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली.

मदनपल्ली, किल्लोर, संगमनेर येथून आवकटोमॅटोची आवक आंध्रप्रदेशच्या मदनपल्ली, किल्लोर आणि अहमदनगरच्या संगमनेर येथून सुरू आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात शेतात पाणी साचल्यामुळे टोमॅटोची तोडणी बंद असून शेतात खराब झाले आहे. काहींचा दर्जा खालावला आहे. शिवाय अनेक कारणांनी टोमॅटो पुरेशा प्रमाणात बाजारात येणे बंद झाले आहे. बेंगळुरू येथील टोमॅटो नागपूर बाजारात येण्यास एक महिना लागणार आहे.

व्यापारी ऑर्डरनुसार माल विक्रीसाठी मागवित आहेत. रविवारी दर्जानुसार टोमॅटोचे क्रेट (२५ किलो) भाव ३ हजार ते ३५०० रुपये होते. तर किरकोळमध्ये २०० किलो रुपये दराने विक्री झाली. टोमॅटो महाग असल्यानंतरही काही लोक खरेदी करीत असल्याचे कळमना ठोक बाजाराचे विक्रेते अविनाश रेवतकर यांनी सांगितले.

दुसरीकडे टोमॅटोचे भाव पाहून अनेक किरकोळ विक्रेत्यांनी विक्री बंद केली आहे. ऑगस्ट महिन्यात संगमनेर, नाशिक आणि बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक सुरू झाल्यानंतर भाव मोठ्या प्रमाणात कमी होतील. शिवाय स्थानिक शेतकऱ्यांकडून सप्टेंबरच्या अखेरपर्यंत माल येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत टोमॅटोचे जास्त भावातच खरेदी करावे लागतील, असे मत कॉटन मार्केटचे अडतिये राम महाजन यांनी व्यक्त केले.

वांगे, फूल कोबी, कोथिंबीर आवाक्यात

सध्या वांगे, फूल कोबी, पत्ता कोबी, कोथिंबीर, मेथी, पालक, भेंडी, फणस आणि अन्य भाज्यांचे भाव आवाक्यात आले आहेत. तर अद्रक, लसूण, हिरवी मिरचीसह कारले, ढेमस या भाज्यांचे भाव जास्त आहेत. औरंगाबाद आणि अन्य भागातून फूल कोबीची आवक वाढल्यामुळे किरकोळमध्ये भाव ४० रुपये किलोपर्यंत कमी झाले आहेत.

टॅग्स :InflationमहागाईFarmerशेतकरी