शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी काँग्रेसकडे ९०० इच्छुकांचे अर्ज; २९ जुलैपासून मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 02:45 IST

मित्रपक्षांना सहभागी करण्यासाठी हालचाली

अतुल कुलकर्णी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे राज्यातील २८८ मतदारसंघांतून ९०० इच्छुकांचे अर्ज आले असून २९ जुलैपासून जिल्हास्तरावर मुलाखती होणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला आहे. त्यामुळे या पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नाहीत, अशी टीका भाजपचे नेते करत होते. मात्र इच्छुकांची संख्या लक्षात घेता गावपताळीवर काँग्रेसचे संघटन मजबूत असल्याचे सिद्ध होते. काँग्रेसमधून एकही कार्यकर्ता भाजप-शिवसेनेत जाण्यास तयार नाही, असेही थोरात म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मित्र पक्षांनाही सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. सर्वांशी विचारविनिमय करूनच जागा वाटप आणि उमेदवार ठरविले जातील. २९, ३० आणि ३१ जुलै रोजी काँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आखण्यात आला असून मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षक या प्रमाणे ७० निरीक्षक नेमण्यात आले आहेत. निरीक्षक आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करतील. त्यानंतर राज्यस्तरीय कमिटीत त्यावर विचार केला जाईल, असेही थोरात यांनी सांगितले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना राज्यात प्रचाराची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.

लोकशाहीची गळचेपीलोकशाही पद्धतीने निवडून आलेले कर्नाटकमधील काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अनैतिक पद्धतीने पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे. ते म्हणाले की, भाजपने नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवणे हेच मोदी शाह यांचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे संपूर्ण देश गेल्या १५ दिवसांपासून पाहात आहे. हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. याकरिता साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर सर्रास सुरु आहे.

दुष्काळ असताना मुख्यमंत्री प्रचारात!राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दौरा आखत आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुखांचे चिरंजीव आदित्य यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पडू लागली आहेत. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना अक्षरश: वाºयावर सोडून दिले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019