शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विधानसभेसाठी काँग्रेसकडे ९०० इच्छुकांचे अर्ज; २९ जुलैपासून मुलाखती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 02:45 IST

मित्रपक्षांना सहभागी करण्यासाठी हालचाली

अतुल कुलकर्णी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे राज्यातील २८८ मतदारसंघांतून ९०० इच्छुकांचे अर्ज आले असून २९ जुलैपासून जिल्हास्तरावर मुलाखती होणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला आहे. त्यामुळे या पक्षाला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नाहीत, अशी टीका भाजपचे नेते करत होते. मात्र इच्छुकांची संख्या लक्षात घेता गावपताळीवर काँग्रेसचे संघटन मजबूत असल्याचे सिद्ध होते. काँग्रेसमधून एकही कार्यकर्ता भाजप-शिवसेनेत जाण्यास तयार नाही, असेही थोरात म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मित्र पक्षांनाही सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. सर्वांशी विचारविनिमय करूनच जागा वाटप आणि उमेदवार ठरविले जातील. २९, ३० आणि ३१ जुलै रोजी काँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आखण्यात आला असून मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षक या प्रमाणे ७० निरीक्षक नेमण्यात आले आहेत. निरीक्षक आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करतील. त्यानंतर राज्यस्तरीय कमिटीत त्यावर विचार केला जाईल, असेही थोरात यांनी सांगितले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना राज्यात प्रचाराची मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.

लोकशाहीची गळचेपीलोकशाही पद्धतीने निवडून आलेले कर्नाटकमधील काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अनैतिक पद्धतीने पाडून भाजपने लोकशाहीची गळचेपी केली आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे. ते म्हणाले की, भाजपने नैतिकता गुंडाळून ठेवली आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवणे हेच मोदी शाह यांचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे संपूर्ण देश गेल्या १५ दिवसांपासून पाहात आहे. हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. याकरिता साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर सर्रास सुरु आहे.

दुष्काळ असताना मुख्यमंत्री प्रचारात!राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दौरा आखत आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुखांचे चिरंजीव आदित्य यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पडू लागली आहेत. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना अक्षरश: वाºयावर सोडून दिले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019