शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

‘सामाजिक न्याय’मधील घोटाळा १८६८ कोटींचा!

By यदू जोशी | Updated: March 5, 2018 04:53 IST

 मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेत तब्बल १ हजार ८६८ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा निष्कर्ष विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) काढलेला असताना अनियमिततेची ही रक्कम ९७७ कोटी रुपये असल्याचा दावा सामाजिक न्याय विभागाने केला आहे.सध्या नागपूरचे पोलीस आयुक्त असलेले के. वेंकटेशम यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ...

 मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेत तब्बल १ हजार ८६८ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा निष्कर्ष विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) काढलेला असताना अनियमिततेची ही रक्कम ९७७ कोटी रुपये असल्याचा दावा सामाजिक न्याय विभागाने केला आहे.सध्या नागपूरचे पोलीस आयुक्त असलेले के. वेंकटेशम यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही एसआयटी स्थापन केली होती. या एसआयटीने २४ जुलै २०१७ रोजी शासनाला अहवाल दिला. या अहवालाची शहानिशा करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने जिल्हावार समित्या स्थापन केल्या. प्रादेशिक उपायुक्त या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा साहाय्यक आयुक्त (सामाजिक न्याय), वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक आणि वित्त विभागाकडून सामाजिक न्याय विभागात नेमण्यात आलेले साहाय्यक संचालक (लेखा) हे सदस्य होते.या समितीमध्ये केवळ साहाय्यक संचालक (लेखा) हेच वित्त विभागातून प्रतिनियुक्तीवर आलेले एकमेव अधिकारी होते. सामाजिक न्याय विभागाला आर्थिक शिस्त लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. सूत्रांनी सांगितले की, एसआयटीने दर्शविलेल्या अनियमिततांची जी खातरजमा सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हावार समित्यांनी केली व अहवाल तयार केले त्यावर कुठेही साहाय्यक संचालक (वित्त) यांच्या सह्याच नाहीत. काही ठिकाणी सह्या करण्यासाठी दबाव आणल्याची व त्यांनी तो झुगारून लावल्याची माहिती आहे. एसआयटीने दाखविलेली १८६८ कोटी रुपयांची रक्कम विभागाने निम्म्यावर आणत अधिकाºयांचा बचाव चालविला असल्याचेही बोलले जात आहे.लोकमतने उपस्थित केलेले प्रश्नएकदा एसआयटीने अहवाल दिल्यानंतर त्याचे विश्लेषण व खात्री करण्याचा अधिकार सामाजिक न्याय विभागाने स्वत:कडे कोणत्या अधिकारात घेतला?एसआयटीने १८६८ कोटींची अनियमितता शोधली, मग त्यावर आलेल्या आक्षेपांवरून विश्लेषण व खात्री करण्याचे कामही एसआयटीलाच देऊन सामाजिक न्याय विभागाने पारदर्शकता का दाखविली नाही?सामाजिक न्याय विभागाने ७०० कोटी रुपयांची रक्कम समायोजित करण्याचा आधार काय होता? विभागामध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या साहाय्यक संचालक (लेखा) यांना विश्वासात का घेतले नाही?७०० कोटींची रक्कम समायोजित केली म्हणजे या सर्व रकमेचा घोटाळाच केला, असे लोकमतचे म्हणणे नाही. आक्षेप हा आहे की, हे समायोजन करताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब का करण्यात आला नाही? हे समायोजन एसआयटीला का दाखविण्यात आले नाही?सामाजिक न्याय विभागाने दिलेली आकडेवारी१. एसआयटीने दाखविलेली अनियमिततेची रक्कम १८६८.०९ कोटी२. विभागाने विश्लेषण करून खात्री केलेली रक्कम ९७७.२४ कोटी३. तफावतीची रक्कम ७००.८३ कोटी४. समायोजित केलेली रक्कम ७००.८३ कोटी५. वसुली करून कोषागारात जमा केलेली रक्कम ९१.३४ कोटी६. अद्याप वसूल करावयाची रक्कम १८५.२६ कोटीविभाग खरा की एसआयटी खरी?एसआयटीने शिष्यवृत्ती घोटाळ्याची रक्कम १ हजार ८६८ कोटी रुपये दाखविली आहे. मात्र विभागाने ती ९७७ कोटींवर आणली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी अलीकडे नागपूर उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन अनियमितता ९७७ कोटींची असल्याचे नमूद केले. एसआयटीचा अहवालही शासनाने अमान्य केलेला नाही. मग नेमके खरे कोण हा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांच्याशी वारंवार संपर्काचा प्रयत्न केला, पण त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र