शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:30 IST

नवाब मलिक : कौशल्य विकास विभागाच्या आॅनलाइन मेळाव्यांसह महास्वयम वेबपोर्टलमुळे झाले शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असतानाही मागील ३ महिन्यांत कौशल्य विकास विभागाने आॅनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. या कालावधीत कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी दिली.

मलिक म्हणाले की, ‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने वेबपोर्टल सुरू केले आहे. त्यावर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. मागील ३ महिन्यांत एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली.

यामध्ये मुंबई विभागातील २४,५२०, नाशिक ३०,१४५, पुणे ३७,५६२, औरंगाबाद ३५,२४३, अमरावती १४,२६० तर नागपूर विभागातील ३०,४३५ उमेदवार आहेत. यापैकी १७,१३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले. यात मुंबई विभागातील ३,७२०, नाशिक ४८२, पुणे १०,३१७, औरंगाबाद १,५६९, अमरावती १,०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवार आहेत. याशिवाय सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून ५८२ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला.आॅनलाइन मुलाखतींना प्राधान्यकौशल्य विकास विभागाने तीन महिन्यांत राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय आॅनलाइन रोजगार मेळाव्यांची मोहीम सुरू केली आहे. जिल्हास्तरावर २४ आॅनलाइन रोजगार मेळावे झाले असून त्यात १६७ उद्योजक सहभागी झाले होते. त्यांच्याकडील १६,११७ जागांसाठी आॅनलाइन मुलाखती झाल्या. या मेळाव्यांमध्ये ४०,२२९ तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २,१४० तरुणांना रोजगार मिळाला.

टॅग्स :jobनोकरी