शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:30 IST

नवाब मलिक : कौशल्य विकास विभागाच्या आॅनलाइन मेळाव्यांसह महास्वयम वेबपोर्टलमुळे झाले शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असतानाही मागील ३ महिन्यांत कौशल्य विकास विभागाने आॅनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. या कालावधीत कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी दिली.

मलिक म्हणाले की, ‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने वेबपोर्टल सुरू केले आहे. त्यावर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. मागील ३ महिन्यांत एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली.

यामध्ये मुंबई विभागातील २४,५२०, नाशिक ३०,१४५, पुणे ३७,५६२, औरंगाबाद ३५,२४३, अमरावती १४,२६० तर नागपूर विभागातील ३०,४३५ उमेदवार आहेत. यापैकी १७,१३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले. यात मुंबई विभागातील ३,७२०, नाशिक ४८२, पुणे १०,३१७, औरंगाबाद १,५६९, अमरावती १,०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवार आहेत. याशिवाय सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून ५८२ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला.आॅनलाइन मुलाखतींना प्राधान्यकौशल्य विकास विभागाने तीन महिन्यांत राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय आॅनलाइन रोजगार मेळाव्यांची मोहीम सुरू केली आहे. जिल्हास्तरावर २४ आॅनलाइन रोजगार मेळावे झाले असून त्यात १६७ उद्योजक सहभागी झाले होते. त्यांच्याकडील १६,११७ जागांसाठी आॅनलाइन मुलाखती झाल्या. या मेळाव्यांमध्ये ४०,२२९ तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २,१४० तरुणांना रोजगार मिळाला.

टॅग्स :jobनोकरी