शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

१६ आमदार निलंबित होणारच; अरविंद सावंत; आता राजकीय नव्हे तर कायदेशीर लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 09:08 IST

शिवसेना भवन येथे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील वकील देवदत्त कामत यांच्याकरवी कायदेशीर बाजू मांडली.

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार जुन्या तरतुदींच्या आधारे आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शिवसेनेच्या नावाने वेगळा गट काढता येणार नाही. अन्य पक्षात विलीनीकरणाशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच उरलेला नाही. सभागृहाबाहेरील कृतीसुद्धा पक्षविरोधी कारवाई ठरते आणि त्यानुसार निलंबनाची कारवाई करता येते, असे विविध दावे करत १६ बंडखोरांवर निलंबनाची कारवाई होणारच, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनाच माध्यमांसमोर आणत आता हा लढा केवळ राजकीय न राहता कायदेशीर बनल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रविवारी स्पष्ट केले. शिवसेना भवन येथे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील वकील देवदत्त कामत यांच्याकरवी कायदेशीर बाजू मांडली. गुवाहाटी येथे थांबलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. या आमदारांवरील कारवाईसाठी आमच्याकडून कायदेशीर बाबींचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कामत यांनी एकनाथ शिंदे गटाकडून केले जाणारे दावे चुकीचे असल्याचा दावा केला. सभागृहाबाहेरही पक्षाचा व्हीप लागू होतो. सभागृहाबाहेरील कृतीसुद्धा पक्षविरोधी ठरली तर सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. सध्याच्या प्रकरणात महत्त्वाच्या प्रसंगी शिवसेनेकडून अनेक बैठका बोलावण्यात आल्या होत्या. मात्र, या बैठकांना बंडखोर आमदार हजर राहिले नाहीत. शिवाय, दुसऱ्या राज्यात जाणे, भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणे, सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणे हे यासंदर्भातल्या कायद्याचे उल्लंघन असल्याचे कामत यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्षांना पूर्ण अधिकार आहेत. उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळला गेला आहे. तसेच, अधिवेशन सुरू झाल्याशिवाय अविश्वास प्रस्ताव मांडला जाऊ शकत नाही, असेही कामत  म्हणाले.

अपात्रतेपासून वाचू शकत नाहीदोनतृतीयांश सदस्यांचा वेगळा गट अन्य पक्षात विलीन झाला तरच अपात्रतेची कारवाई होत नाही. आतापर्यंत कोणत्याही प्रकारे विलीनीकरण झालेले नाही. २००३ पूर्वी आमदारांना वेगळे होण्यासंदर्भात दोनतृतीयांश सदस्यसंख्येचा नियम होता. पण त्यानंतर विलीनीकरणाची अट त्यात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे विलीनीकरण झाल्याशिवाय ते अपात्रतेपासून वाचू शकत नाही, असे कामत यांनी सांगितले. 

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे