शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

विभागातील १६ मध्यम प्रकल्पांची स्थिती चांगली! पाण्याची समस्या सुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 18:19 IST

पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे.

अमरावती : पश्चिम विदर्भातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा सद्यस्थितीत असल्याने पुढील वर्षाची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे. मात्र, उर्वरित सात मध्यम प्रकल्पांमध्ये ३५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा नाही. बुलडाणा जिल्ह्यात हे प्रकल्प आहेत. यामुळे येथे उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.पश्चिम विदर्भातील एकूण २४ प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ६७६.७४ दलघमी एवढा आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाढा हा ४५६.०९ दलघमी आहे. २४ प्रकल्पांमध्ये सरासरी ६७.४० टक्के पाणीसाठा असला तरी यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यांची स्थिती खूपच चांगली आहे. त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये ५० टक्क््यांंपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्याला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आॅक्टोबरमध्ये या जिल्ह्यातील सिंचनाला पाणी किती द्यायचे किंवा नाही तसेच पिण्यासाठी किती साठा राखीव ठेवायचा, यासंदर्भाचे धोरण ठरणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. 

अशी आहे, प्रकल्पनिहाय पाणीसाठ्याची स्थिती...अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पात ६४.०५ टक्के, चंद्रभागा ७१.१८ टक्के, पूर्णा ५०.१० टक्के,  सपन ८७.२३ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस ९०.०२ टक्के,  सायखेडा १०० टक्के,  गोकी ८८.०८ टक्के,  वाघाडी ८२.०४ टक्के,  बोरगाव १०० टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ४९.७१ टक्के,  उमा १०० टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ९१.६९ टक्के, सोनल १००टक्के, एकबर्जी १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा १९.९८ टक्के,  पलढग २५.५७ टक्के, मस ४.१२ टक्के,  कोराडी  ६.२८ टक्के, मन २४.६८टक्के, तोरणा १४.३२ टक्के आणि उतावळी प्रकल्पात ३५.८३ टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :DamधरणAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र