शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

१५५ शेततळ्यांचे काम पूर्ण, शेतक-यांचा प्रतिसाद वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:49 AM

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने किमान जमीन धारण क्षेत्राची अट शिथिल केल्याने शेतकºयांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात १५५ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७३३ शेतकºयांच्या अर्जांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. तालुकास्तरीय समितीने ...

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेस जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने किमान जमीन धारण क्षेत्राची अट शिथिल केल्याने शेतकºयांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात १५५ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ७३३ शेतकºयांच्या अर्जांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. तालुकास्तरीय समितीने छाननी करु न एकूण २७५ अर्जांना मंजुरी दिली असून तसे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत. मान्यताप्राप्त कामांपैकी ३० जून २०१७ अखेर १५५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यासाठी एकूण ६८ कोटी ४८ लाख रु पयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातील निधी संबंधित शेतकरी खातेदारांच्या बँक खात्यावर आर.टी.जी.एस. पद्धतीने जमा करण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबविण्यात येत आहे. कोकण विभागातील भौगोलिक परिस्थिती व शेतकºयांची जमीनधारण क्षमता अत्यल्प असल्याने या योजनेंतर्गत ०.६० हेक्टर किमान धारण क्षेत्राची अट शिथिल करु न ती ०.०२ हेक्टर करण्यास २० मे रोजी जारी केलेल्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना त्याचा लाभ होत आहे.