शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

पाण्याअभावी १४ टक्के पीक घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 07:07 IST

अवघ्या ३२ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकाची पेरणी

पुणे : राज्यात दुष्काळ पडल्याने अनेक शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणीच करता आली नाही. शेतीसाठी पाणीच नसल्याने उन्हाळी पीक पेरणीही करपली आहेत. राज्यातील उन्हाळी पिकाच्या सरासरी क्षेत्राच्या अवघ्या ३२ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली असून गेल्या वर्षापेक्षा यंदा उन्हाळी पिकांचे १४ टक्के घटले आहे.पावसाने यंदा महाराष्ट्रावर चांगलीच अवकृपा दाखवली. राज्यातील काही भागातील खरिपाच्या पिकांना आणि त्यानंतर बहुतांश भागात रब्बी पिकांना वेळेवर पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात रब्बी पिकांच्या पेरण्याच होऊ शकल्या नाही. त्यात कृषी विभागाच्या अहवालानुसार राज्यात यंदा उन्हाळी पिकांच्या पेरणीत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात उन्हाळी पिकाचे सरासरी १.६८ लाख हेक्टर क्षेत्र असून आत्तापर्यंत केवळ ०.५२ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात औरंगाबाद विभाग वगळता इतर विभागात उन्हाळी पिकांची पेरणी सुरू आहे.नागपूर विभागात उन्हाळी पिकांची सर्वाधिक ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण विभागात ४३ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली असून भात पिकाची लावणी व भुईमूग पिकाच्या पेरणीची कामे सुरू आहेत. नाशिक विभागात २२ क्षेत्रांवर पेरणी झाली असून पुणे विभागात केवळ ११ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर कोल्हापूर विभागात २१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून उन्हाळी भुईमूग फांद्या फुटण्याच्या अवस्थेत तर मका पीक उगवणे ते वाढीच्या अवस्थेत आहे. लातूर विभागात केवळ ९ टक्के क्षेत्रावर तर अमरावती विभागात २४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.राज्यात उन्हाळी मका व भूईमुग पीक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. राज्यात उन्हाळी मका पिकाचे सरासरी क्षेत्र २४ हजार ६९९ असून आत्तापर्यंत ७ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे. तर भूईमुगाच्या ८२ हजार २४४ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ९ हजार ६३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.विशेष काळजी...कृषी विभागाने भूईमुग, मका आणि आंबा पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कृषी सल्ला केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. भूईमुगावरील पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी आळी यावर नियंत्रण आणण्यासाठी औषधे सुचवली आहेत. तर उन्हाळ्यात भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याबाबत काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.