शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ३० हजार रस्ते अपघातांत १३ हजार मृत्यू; परिवहनमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 07:11 IST

राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात १३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.

मुंबई  - राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३० हजार रस्ते अपघात झाले असून त्यात १३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. एकूण अपघातांमध्ये सुमारे ११ हजार मृत्यू म्हणजे ८० टक्के मृत्यू हे मानवी चुकांमुळे झाल्याचेही त्यांनी सांगितले. अपघातांबाबत जनजागृती करण्यासाठीच परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेमार्फत राज्यभरात ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’चे आयोजन केले असून त्याच्या शुभारंभाप्रसंगी रावते बोलत होते.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात रावते यांनी सांगितले की, राज्यात वाहनांची संख्या ३ कोटी २९ लाख इतकी झाली असून त्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. अपघातांची आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. वाहनांच्या वेगाबरोबर अपघातांची आणि त्यातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे हा अति वेगामुळे मृत्यूचा सापळा झाला आहे.अपघात रोखण्यासाठी सर्वांनी रस्ते सुरक्षेबाबत जाणीव ठेवून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक व कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. पण शासनाने हेल्मेटची सक्ती केली, असे म्हणत या चांगल्या मोहिमेबाबत अपप्रचार केला जात आहे. वृत्तपत्रांनीही या मोहिमेला ‘सक्ती’ असे न म्हणता हेल्मेटच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.अपघाती मृत्यूमध्ये तरुणांचे प्रमाण अधिकपरिवहन आयुक्त शेखर चन्ने या वेळी म्हणाले, राज्यात ३ कोटी ४१ लाख इतके परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यात अपघातांचे प्रमाण ०.३६ टक्क्यांनी कमी झाले असले, तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण मात्र ४ टक्क्यांनी वाढले आहे. पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकी यांच्या अपघातांचे प्रमाण हे ६६ टक्के इतके आहे. अपघाती मृत्यूमध्ये २५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. राज्यात १ हजार ३२४ इतके ब्लॅक स्पॉट असून ते काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.मुंबईत सीसीटीव्हीमुळे कारवाईत वाढमुंबई शहरात अतिवेग आणि बेदरकार वाहन चालविल्याप्रकरणी २०१७ मध्ये ४१ हजार कारवाया करण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे १ जानेवारी २०१८ पासून शहरात अशा ७ लाख ७० हजार लोकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी दिली.वाहतुकीचे नियम मोडणाºयांवर सध्या मुंबईत ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येत असून लवकरच संपूर्ण राज्यात ही यंत्रणा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.च्रस्ते अपघातात अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत. जनजागृती करूनही अतिघाईत वेगावर नियंत्रण ठेवत नसल्यामुळेच अनेकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.राज्यात २०१६ मध्ये १२ हजार ९३५, २०१७ मध्ये १२ हजार ५११ तर २०१८ मध्ये १३ हजार ५९ अपघाती मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात