शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

किनारपट्टी भागांमध्ये उभारणार १३ विकास केंद्र, काेकणात पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:43 IST

Konkan News: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १०५ गावांमध्ये १३ विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) विकसित केली जाणार आहेत. यातील रेवस रेड्डी सागरीकिनारा मार्ग आणि प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गानजीक ११ विकास केंद्र उभारली जाणार आहेत.

 मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १०५ गावांमध्ये १३ विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) विकसित केली जाणार आहेत. यातील रेवस रेड्डी सागरीकिनारा मार्ग आणि प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गानजीक ११ विकास केंद्र उभारली जाणार आहेत. यातील बहुतांश विकास केंद्र किनारपट्टीला लागून असून, यातून कोकणातील पर्यटन व्यवसाय आणि कृषिक्षेत्राला चालना दिली जाणार आहे.

राज्याला ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. मात्र नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असूनही कोकणाचा असंतुलित विकास झाला आहे. सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, किल्ले अन्य पर्यटनस्थळे आहेत. तसेच हापूस आंबा, काजू, नारळ आणि सुपारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. आता  ऐतिहासिक स्थळे, पर्यटन ठिकाणे आणि कृषी उत्पादन क्षेत्रांच्या नजीक नवनगरे विकसित करून त्याद्वारे विकास साधण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. 

पालघरमध्ये दोन केंद्रांचा समावेश    पालघर जिल्ह्यात वाढवण आणि केळवा येथे दोन विकास केंद्र आहेत. औद्योगिक पट्ट्यात ही विकास केंद्र असल्याने त्याअनुषंगाने त्यांचा विकास साधला जाणार आहे.     कोकणातील अन्य ११ विकास केंद्रांमध्ये पर्यटन आणि कृषिक्षेत्राला चालना देण्याचा मानस आहेत. त्यातून या क्षेत्रांच्या परिसराचा नियोजित विकास साधणे शक्य होणार आहे.     सिडको किंवा अन्य प्राधिकरणे भूसंपादन करून नवनगरे वसवतात, त्याप्रमाणे या ग्रोथ सेंटरमध्ये कोठेही भूसंपादन केले जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :konkanकोकणMaharashtraमहाराष्ट्र