शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

किनारपट्टी भागांमध्ये उभारणार १३ विकास केंद्र, काेकणात पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:43 IST

Konkan News: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १०५ गावांमध्ये १३ विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) विकसित केली जाणार आहेत. यातील रेवस रेड्डी सागरीकिनारा मार्ग आणि प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गानजीक ११ विकास केंद्र उभारली जाणार आहेत.

 मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १०५ गावांमध्ये १३ विकास केंद्र (ग्रोथ सेंटर) विकसित केली जाणार आहेत. यातील रेवस रेड्डी सागरीकिनारा मार्ग आणि प्रस्तावित कोकण द्रुतगती महामार्गानजीक ११ विकास केंद्र उभारली जाणार आहेत. यातील बहुतांश विकास केंद्र किनारपट्टीला लागून असून, यातून कोकणातील पर्यटन व्यवसाय आणि कृषिक्षेत्राला चालना दिली जाणार आहे.

राज्याला ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. मात्र नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असूनही कोकणाचा असंतुलित विकास झाला आहे. सुंदर समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, किल्ले अन्य पर्यटनस्थळे आहेत. तसेच हापूस आंबा, काजू, नारळ आणि सुपारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. आता  ऐतिहासिक स्थळे, पर्यटन ठिकाणे आणि कृषी उत्पादन क्षेत्रांच्या नजीक नवनगरे विकसित करून त्याद्वारे विकास साधण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. 

पालघरमध्ये दोन केंद्रांचा समावेश    पालघर जिल्ह्यात वाढवण आणि केळवा येथे दोन विकास केंद्र आहेत. औद्योगिक पट्ट्यात ही विकास केंद्र असल्याने त्याअनुषंगाने त्यांचा विकास साधला जाणार आहे.     कोकणातील अन्य ११ विकास केंद्रांमध्ये पर्यटन आणि कृषिक्षेत्राला चालना देण्याचा मानस आहेत. त्यातून या क्षेत्रांच्या परिसराचा नियोजित विकास साधणे शक्य होणार आहे.     सिडको किंवा अन्य प्राधिकरणे भूसंपादन करून नवनगरे वसवतात, त्याप्रमाणे या ग्रोथ सेंटरमध्ये कोठेही भूसंपादन केले जाणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :konkanकोकणMaharashtraमहाराष्ट्र