शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

सार्वभाैम अधिकारांचा ‘त्या’ निर्णयाने संकोच; राष्ट्रपती काेविंद यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 10:04 IST

बारा आमदार निलंबनाच्या निर्णयाचे पडसाद सुरूच

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेने बारा आमदारांचे केलेले निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सार्वभौम विधिमंडळाच्या अधिकारांचा संकोच होत आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी आपल्या अधिकारांचा वापर करत न्यायालयाच्या निर्णयाचा परामर्श घ्यावा, अशी विनंती विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.

बारा भाजप आमदारांचे वर्षभराचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यावरून न्यायपालिका आणि विधिमंडळाच्या अधिकारांचा प्रश्न उपस्थित झाला. यासंदर्भात शुक्रवारी रामराजे नाईक-निंबाळकर, नरहरी झिरवळ आणि नीलम गोऱ्हे यांनी राजभवन येथे राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेत निवेदन सादर केले.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर त्याची सविस्तर माहिती  माध्यमांना देण्यात आली.

त्यावेळी नाईक-निंबाळकर म्हणाले की, ‘बारा आमदार निलंबन आणि त्यावरील न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली. न्यायालयाच्या निकालामुळे राज्यघटनेला अभिप्रेत असलेले तीन स्तंभांमधील ‘सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण’ हे तत्त्व   बाधित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी हा विषय घटनापीठाकडे सोपवून याबाबतची स्पष्टता करावी. राष्ट्रपतींना तसे अधिकार आहेत, अन्यथा आम्हाला विधिमंडळाचे कामकाज करणे अवघड होईल.’ याबाबत स्पष्टता यायला हवी

राष्ट्रपती कोविंद यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. १५ मिनिटे संवाद आमचा झाला. यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी याबाबत सर्व बाबी तपासून घेण्याचे आश्वासन दिल्याचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले. ७० वर्षांच्या लोकशाहीत प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच हस्तक्षेप करून अशा प्रकारचा निर्णय घेतला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आम्हाला भाष्य करायचे नाही; पण यासंदर्भात एकदा स्पष्टता यायला हवी. सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून या प्रकरणातील न्यायालयीन हस्तक्षेप स्वीकारला. सध्या हे आमदार विधिमंडळात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय