शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

धक्कादायक! 'या' जिल्ह्यात महिन्याभरात ११८ बालकांचा मृत्यू; तरीही प्रशासनाला जाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 7:28 AM

सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत एकूण दोन हजार ९९२ बालकांचा जन्म झाला, तर शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाला आहे.

- रमाकांत पाटीलनंदुरबार : राज्यात सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. हा मृत्यूदर राज्याच्या सरासरी दरापेक्षा दुप्पट असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे. सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत एकूण दोन हजार ९९२ बालकांचा जन्म झाला, तर शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात शून्य ते २८ दिवसांचे ३७, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ३८, एक वर्ष ते पाच वर्षे वयोगटातील २० आणि उपजत २३ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सहा मातांचाही मृत्यू झाला आहे. राज्यात एकीकडे शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा मृत्यूदर सरासरी हजारी २१ आहे. मात्र, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात या प्रमाणानुसार मृत्यूदर दुप्पट झाल्याचे चित्र समोर आले आहे. मृत्यू झालेल्या बालकांमध्ये नवापूर बालविकास प्रकल्पात सर्वाधिक म्हणजे २२ बालकांचा मृत्यू झाला आहे, तर तोरणमाळ प्रकल्पात १६, अक्कलकुवा प्रकल्पात १५ बालकांचा मृत्यू झाला आहे.कुपोषित बालकांची संख्या कागदावरच घटवली जात असल्याची ओरड नेहमीचीच आहे. सर्वेक्षण होते तेव्हा बालकांची संख्या वाढते. ती दर महिन्याला कमी होत जाते. असा प्रकार आता पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्यपालांच्या दत्तक गावातच तक्रारराज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी (ता. अक्कलकुवा) गावात चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका येत नसल्याची, तसेच पोषण आहारही वितरित झाला नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. आरोग्य तपासणीच्या वेळेसही त्या अनुपस्थित असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भातील चौकशीसाठी स्थानिक अधिकारी गावात जाऊनही कुठलीही कार्यवाही झाली नाही.