शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 10:32 IST

ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे.

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतून नेपाळमध्येपर्यटनासाठी गेलेले १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमध्ये उद्भवलेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नेपाळचा प्रवास टाळावा, तसेच जे नागरिक सध्या नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानीच सुरक्षित राहावे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. 

ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनाने परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आपत्कालीन कार्य केंद्राने मदतीसाठी नेपाळमधील  ९७७-९८० ८६० २८८१ आणि  ९७७-९८१ ०३२ ६१३४ हे दोन मोबाइल क्रमांक तर राज्यातील  ९१- ९३२१५८७१४३  आणि  ९१-८६५७११२३३३ हे दोन मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिले असून या क्रमांकांवर व्हॉट्सअॅप कॉलही लावता येईल.

पर्यटकांना सुखरूप परत आणण्यास प्राधान्य

नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये.-अजित पवार, उपमुख्यमंत्री

पर्यटनाला फटका, ५०० पर्यटकांनी केला नेपाळ दौरा रद्द 

कोल्हापुरातून नेपाळसाठी प्रत्येक वर्षी हजारांहून अधिक पर्यटक जातात. नेपाळमधील सुंदर मंदिरे, स्वच्छता अन् एकूणच तेथील संस्कृतीची भुरळ उभ्या देशाला आहे. नेपाळचे हेच सौंदर्य पाहण्यासाठी कोल्हापुरातून प्रत्येक वर्षी हजारांच्या वर पर्यटक नेपाळला जातात. मात्र, नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नेपाळ सहलीवर जाणाऱ्या कोल्हापुरातील ५०० हून अधिक इच्छुक पर्यटकांनी नेपाळ दौरा रद्द केला आहे.

नेपाळमधील उद्रेक पाहून पर्यटकांनी टूरिस्ट कंपन्यांना मेल पाठवून बुकिंग रद्द करण्याची विनंती केली आहे. मात्र, टूरिस्ट कंपन्यांनी विमानांचे तिकीट आधीच बुक केल्याने ते तिकीट रद्द करण्यास विमान कंपन्या तयार नाहीत. आम्ही सेवा द्यायला तयार आहोत, असा पवित्रा विमान कंपन्यांनी घेतल्याने टूरिस्ट कंपन्यांचीही गोची झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील ५०० पर्यटकांनी त्यांचा नियोजित नेपाळ दौरा रद्द केला आहे . यामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे, असे  कोल्हापूर जिल्हा टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन अध्यक्ष बळीराम वराडे यांनी सांगितले.

टॅग्स :NepalनेपाळCorruptionभ्रष्टाचारSocial Mediaसोशल मीडियाMaharashtraमहाराष्ट्रtourismपर्यटन