शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मालखान्यात १०० मोबाईल, ८ लॅपटॉपने खाल्ली धूळ; १३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर ठरला लिलाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 23:47 IST

रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही.

नागपूर: धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात अपवाद वगळता प्रत्येकालाच मोबाईल आपला सखाहरी वाटतो. चार्जिंग संपून तो बंद झाला तरी माणसाला मोठी कमतरता जाणवते. मोबाईल हरवला की माणूस थेट 'पॅनिक मोड'मध्ये जातो. त्याला सगळ जग थांबल्यासारख वाटतं. अशा स्थितीत रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही. खरे वाटो की खोटे, हे वास्तव आहे !

विविध गुन्ह्यांचा छडा लावताना रोख रक्कम, दागिने आणि माैल्यवान चिजवस्तूंसह रेल्वे पोलिसांच्या हाती शेकडो मोबाईल अन् लॅपटॉपही लागले. संबंधितांनी आधीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सोयीनुसार कायदेशिर प्रक्रिया पार पाडून अनेकांनी आपापल्या चिवजस्तू पोलिसांकडून परत नेल्या. मात्र, १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप ‘अनाथ’च राहिले. ज्याचे त्याने परत घेऊन जावे म्हणून रेल्वे पोलिसांनी वेळोवेळी जाहिराती व नोटीस काढून मालकांना हाक दिली. पण कोणीच दाद देईना. एक दशकापेक्षा जास्त कालावधीपासून मोबाईलसह धूळखात पडून असलेले लॅपटॉपही आता निकामी झाले आहेत. त्याचे काय करावे, असा प्रश्न पडल्याने शेवटी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.

'त्या सर्वांचा' लिलाव कराकोर्टाने पोलिसांच्या मालखान्यात धूळ खात पडलेल्या मोबाईल, लॅपटॉपवर निर्णय देताना 'त्या सर्वांचा' लिलाव करा आणि त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा करा, असे आदेश दिले. त्यामुळे आता या मोबाईल, लॅपटॉपचा लिलाव मंगळवारी ५ ऑगस्टला रेल्वे पोलीस ठाण्यात केला जाणार आहे.

अपवाद पुन्हा एकदा अधोरेखित!गावखेडे असो की शहर, व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्यांच्याकडे मोबाईल नसेल असा विरळाच. लाडका मोबाईल नेहमीच जवळ असावा, असा जवळजवळ प्रत्येकाचा आग्रह असतो. जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेला तर तो पुन्हा मिळेपर्यंत तो शांत बसत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीला 'काही लोक अपवाद असतात' हे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर