शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पोलिसांच्या मालखान्यात १०० मोबाईल, ८ लॅपटॉपने खाल्ली धूळ; १३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर ठरला लिलाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 23:47 IST

रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही.

नागपूर: धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात अपवाद वगळता प्रत्येकालाच मोबाईल आपला सखाहरी वाटतो. चार्जिंग संपून तो बंद झाला तरी माणसाला मोठी कमतरता जाणवते. मोबाईल हरवला की माणूस थेट 'पॅनिक मोड'मध्ये जातो. त्याला सगळ जग थांबल्यासारख वाटतं. अशा स्थितीत रेल्वे पोलिसांच्या मालखान्यात एक, दोन नव्हे, तब्बल १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप गेली १३ वर्षं धुळ खात पडून आहेत. गंमत म्हणजे त्यावर हक्क सांगायला एकही ‘मालक’ पुढे आलेला नाही. खरे वाटो की खोटे, हे वास्तव आहे !

विविध गुन्ह्यांचा छडा लावताना रोख रक्कम, दागिने आणि माैल्यवान चिजवस्तूंसह रेल्वे पोलिसांच्या हाती शेकडो मोबाईल अन् लॅपटॉपही लागले. संबंधितांनी आधीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सोयीनुसार कायदेशिर प्रक्रिया पार पाडून अनेकांनी आपापल्या चिवजस्तू पोलिसांकडून परत नेल्या. मात्र, १०० मोबाईल आणि ८ लॅपटॉप ‘अनाथ’च राहिले. ज्याचे त्याने परत घेऊन जावे म्हणून रेल्वे पोलिसांनी वेळोवेळी जाहिराती व नोटीस काढून मालकांना हाक दिली. पण कोणीच दाद देईना. एक दशकापेक्षा जास्त कालावधीपासून मोबाईलसह धूळखात पडून असलेले लॅपटॉपही आता निकामी झाले आहेत. त्याचे काय करावे, असा प्रश्न पडल्याने शेवटी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.

'त्या सर्वांचा' लिलाव कराकोर्टाने पोलिसांच्या मालखान्यात धूळ खात पडलेल्या मोबाईल, लॅपटॉपवर निर्णय देताना 'त्या सर्वांचा' लिलाव करा आणि त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा करा, असे आदेश दिले. त्यामुळे आता या मोबाईल, लॅपटॉपचा लिलाव मंगळवारी ५ ऑगस्टला रेल्वे पोलीस ठाण्यात केला जाणार आहे.

अपवाद पुन्हा एकदा अधोरेखित!गावखेडे असो की शहर, व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्यांच्याकडे मोबाईल नसेल असा विरळाच. लाडका मोबाईल नेहमीच जवळ असावा, असा जवळजवळ प्रत्येकाचा आग्रह असतो. जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेला तर तो पुन्हा मिळेपर्यंत तो शांत बसत नाही. मात्र प्रत्येक गोष्टीला 'काही लोक अपवाद असतात' हे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर