शहरं
Join us  
Trending Stories
1
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
2
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
3
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
4
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
5
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
6
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
7
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
8
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
9
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
10
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
11
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
12
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
13
Astro Tips: राजेशाही आयुष्य जगायचंय? २०२६ सुरु होण्याआधी करा 'हा' प्रभावी उपाय!
14
घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...   
15
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
16
पत्नीने कर्ज फेडलं नाही म्हणून बँकेने पतीची पेन्शन कापली; आता ५ लाख नुकसान भरपाई द्यावी लागणार
17
का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
18
भारतात ई-पासपोर्ट डिलिव्हरीस सुरुवात! जून २०२५ पर्यंत पूर्ण बदलणार, जुन्या पासपोर्टधारकांचे काय...
19
‘स्वबळावर लढण्याच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा; सर्वांनीच सबुरीने घ्या’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सल्ला
20
Hot Chocolate Recipe: वजन वाढण्याची चिंता सोडा! 'गिल्ट-फ्री' राहून पौष्टिक हॉट चॉकलेटचा घरीच आस्वाद घ्या 
Daily Top 2Weekly Top 5

निविदेविना १०० कोटींचे कंत्राट

By admin | Updated: July 14, 2017 06:13 IST

साफसफाई, माळीकाम, सुरक्षा आणि वीज देखभालीचे शंभर कोटी रुपयांहून अधिकचे कंत्राट कोणतीही निविदा न काढता देण्यात आले

यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांची वसतिगृहे, निवासी शाळा आणि सामाजिक न्याय भवनांची साफसफाई, माळीकाम, सुरक्षा आणि वीज देखभालीचे शंभर कोटी रुपयांहून अधिकचे कंत्राट कोणतीही निविदा न काढता देण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्वत: सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनीच यातील एका कंपनीच्या कामात अक्षम्य त्रुटी असल्याचे विभागाला कळवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सांगितले आणि नंतर दोन्ही कंपन्यांना मुदतवाढ देण्याचा आदेशही दिला. या दोन कंपन्यांना पहिले कंत्राट २०१३ मध्ये आघाडी सरकारच्या काळात देण्यात आले होते आणि या कंत्राटापोटी त्यांना मासिक ९ कोटी रुपये देण्यात येत होते. त्यात हे कंत्राट ज्या जीआरच्या आधारे देण्यात आले. त्यात स्पष्टपणे नमूद केले होते की कंत्राटदाराचे काम समाधानकारक असेल तरच त्यांना मुदतवाढ दिली जाईल. सप्टेंबर २०१६ मध्ये कंत्राटाचा तीन वर्षांचा कालवधी संपला. त्या आधी १० मार्च २०१६ रोजी सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी वरळी; मुंबईच्या बीडीडी चाळीत असलेल्या शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली आणि कंत्राटदार कंपनीचे काम अजिबात समाधानकारक नाही, असे नमूद करीत त्यांनी तब्बल १६ गंभीर मुद्यांकडे लक्ष वेधणारे पत्र विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिवांना दिले. या कंपनीला आतापर्यंत कितीवेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, काळ्या यादीत का टाकले नाही अशी संतप्त विचारणा बडोले यांनी त्या पत्रात केली होती. त्याच बडोलेंनी पुढे या कंपनीला नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ द्यावी, असा आदेश काढला. ज्या कंपनीबाबत बडोले यांनी तीव्र शब्दात मार्च २०१६ मध्ये पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली त्याच कंपनीला मुदतवाढ देण्याची भूमिका त्यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये का घेतली असा प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. भाजपाचे उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने यांनी सामाजिक न्याय विभागाला दोन्ही कंपन्यांबद्दल गंभीर तक्रारींचे पत्र दिले होते. या शिवाय काही संस्था आणि व्यक्तींनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध वेळोवेळी तक्रारी केलेल्या होत्या. लोकमतजवळ या संबंधीची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. सप्टेंबर २०१६ मध्ये कंत्राटाची मुदत संपणार हे विभागाला माहिती होते. त्यामुळे नवीन कंत्राटासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया किमान तीन महिने आधी म्हणजे जून २०१६ मध्ये सुरू करायला हवी होती. विभागाचे तत्कालिन सुरेंद्रकुमार बागडे यांनी निविदेचा मसुदा मान्यतेसाठी १३ डिसेंबर २०१६ रोजी मंत्री बडोले यांच्याकडे पाठविला आणि बडोेले यांनी त्यास एप्रिल २०१७ मध्ये मान्यता दिली.आघाडी सरकारमध्ये या दोन्ही कंपन्यांना कंत्राटापोटी कोट्यवधी रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात त्यातून किती आणि कशी देखभाल झाली याचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे.>आर्थिक लाभ वळता करण्यात आल्याचे दिसतेदोन्ही कंपन्यांना मुदतवाढ देऊन मोठा आर्थिक लाभ देण्यामागे असलेली एक व्यक्ती अत्यंत वादग्रस्त असून काही मंत्र्यांच्या नजीकची आहे. मधुर ‘वाणी’ वापरून विविध विभागांतील कंत्राटे काही विशिष्ट कंपन्यांना मिळवून देणारे हे ‘लाल’ अनेकांना भुरळ घालतात. त्यांच्या कंपन्यांना सदर कंत्राटातील आर्थिक लाभ वळता करण्यात आल्याचे बँक व्यवहारातून दिसते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कोणतेही कंत्राट हे निविदा काढूनच दिले जाईल अशी स्पष्ट भूमिका पारदर्शकतेसाठी घेतली होती. तरीही आघाडी सरकारच्या काळातील जीआरचा आधार घेऊन दोन्ही कंपन्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यातील एका कंपनीविरुद्ध तर मंत्र्यांनीच तक्रारी केलेल्या होत्या!