शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दहा महिन्यांत रेल्वेतील ३२ लाख ७१ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा

By appasaheb.patil | Updated: February 13, 2020 10:53 IST

मध्य रेल्वे; १६८ कोटी नऊ लाखांचा दंड वसूल, मागील वर्षीच्या तुलनेत १४़३५ टक्क्यांची झाली वाढ

ठळक मुद्देजानेवारी २०२० पर्यंत विनातिकीट प्रवास करणाºया ३२ लाख ७१ हजार प्रवाशांवर कारवाईमागील वर्षी याच काळात १४७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला होतामागील वर्षीच्या तुलनेत यंदा १४़३५ टक्क्यांची वाढ

सुजल पाटील 

सोलापूर :  मध्य रेल्वेच्या पाच विभागातील ४७७ रेल्वे स्थानकांवरून धावणाºया मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमध्ये एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत विनातिकीट प्रवास करणाºया ३२ लाख ७१ हजार प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १६८ कोटी नऊ लाखांचा दंड वसूल करण्यात आला़ मागील वर्षी याच काळात १४७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता़ मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १४़३५ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्र, ईशान्य कर्नाटक आणि दक्षिण मध्य प्रदेशाच्या काही भागात रेल्वेचे जाळे निर्माण केले आहे़ ज्यामध्ये मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या पाच विभागांचा समावेश असून, या पाच विभागांत ४७७ रेल्वे स्थानक आहेत़ मध्य रेल्वे या पाच विभागांतून मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कानाकोपºयातील दररोज ३० लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.

मुंबई उपनगरातून १५७३ उपनगरी गाड्या तर पुणे विभागातील पुणे-लोणावळा विभागात ४० उपनगरी सेवा चालवल्या जातात. मागील काही दिवसांपासून प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या उत्पन्नात भरच पडत आहे़ मात्र वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन फुकट प्रवास करणाºयांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच असल्याचे समोर आले़ त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्रत्येक विभागातील अधिकाºयांचे विविध पथक तयार करून विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी, अनियमित प्रवासी व प्रमाणापेक्षा जास्त सामान घेऊन जाणारे प्रवासी, अस्वच्छता पसरविणारे प्रवासी व धूम्रपान करणारे अशांवर कारवाई सुरू केली़ ज्यातून मागील दहा महिन्यांत १६८ कोटी नऊ लाखांचा दंड जमा झाला.

रेल्वेतून विनातिकीट प्रवास करीत असल्याच्या बाबी अनेक वेळा समोर आल्या होत्या़ विनातिकीट प्रवास करून रेल्वे प्रशासनाचे नुकसान करणाºया प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाले होते़ त्यानुसार मध्य रेल्वे विभागातील सर्वच रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे़ तिकीट न काढणाºया प्रवाशांसह इतर गैरकृत्य करणाºया प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

मध्य रेल्वेच्या कारवाईचा धावता आढावा...मध्य रेल्वेने जानेवारी २०१९ या कालावधीतील ११़४४ कोटी रुपयांच्या तुलनेत जानेवारी २०२० या कालावधीत १२.९५ कोटी रुपयांची कमाई केली असून, अशाप्रकारे १३.२० टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी २०१९ मध्ये बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट, अनियमित प्रवासाची २.५१ लाख प्रकरणे आढळली तर जानेवारी २०२० मध्ये २.८२ लाख प्रकरणे आढळली. अशाप्रकारे १२.३५ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि विनाबुक सामानाची एकूण ३२.७१ लाख प्रकरणे आढळून आली आहेत, तर मागील वर्षी याच काळात २९.५६ लाख प्रकरणे आढळली होती. अशाप्रकारे या आर्थिक वर्षात १०.६५ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि विनाबुक सामानाच्या प्रकरणातून १६८.०९ कोटी रुपये वसूल केले तर मागील वर्षी याच काळात १४७ कोटी रुपये वसूल केले होते, अशाप्रकारे या आर्थिक वर्षात १४.३५ टक्के वाढ झाली आहे. जानेवारी २०२० या कालावधीत आरक्षित प्रवासाच्या तिकिटांच्या हस्तांतरणाची २४७ प्रकरणे आढळून आली आणि दंड स्वरूपात १.९९ लाख रुपये वसूल करण्यात आले.

मध्य रेल्वे प्रवाशांसाठी उत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे़ तसेच विनातिकीट प्रवासावर आळा घालण्यासाठी नियमितपणे विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरोधात तीव्र मोहीम राबविली जात आहे. विनातिकीट प्रवासामुळे होणारा महसुलातील तोटा आणि अशा इतर अनियमिततेचे वरिष्ठ अधिकारी बारकाईने निरीक्षण करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी असुविधा टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करावा.- प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वे