शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 05:54 IST

पडझड आणि घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र कोकणासह विदर्भातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. पूरपरिस्थितीमुळे १ लाख २४ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले. पुरात वाहून जाणे, वीज पडणे व इतर दुर्घटनांमध्ये तब्बल ९४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तीन हजारांहून अधिक पशूंचाही दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला. पडझड आणि घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले.

मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा 

महिनाभरात काहीसा दिलासा मिळाला असला तरी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्हे अद्यापही सर्वदूर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये नांदेड जिल्ह्यात १७, जालन्यात २५, बीडमध्ये २७ जनावरे दगावली.  धाराशिवमध्ये २७४ घरांचे, तर पालघरमध्ये ३४१ घरांचे नुकसान झाले. दुर्घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात ६ तर पालघरमध्ये ८ जणांचे मृत्यू झाले.

वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

गंगाखेड (जि. परभणी) : तालुक्यातील महातपुरी शिवारात अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. भगवान शिवाजी चव्हाण (३८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते एका झाडाखाली थांबले होते. त्याचवेळी वीज कोसळली.

कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूच

कोल्हापूर : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पातळीमध्ये गुरुवारी एका इंचाने वाढ झाली. परंतु पुन्हा दुपारनंतर ही पातळी कमी होऊ लागल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ७३ बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत.    

ऑगस्ट महिन्यात देशभरात कसा असेल पाऊस?

पुणे : राज्यामध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला आहे. तर येत्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कमी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी दिला. ऑगस्टमध्ये देशात सरासरी पाऊस पडेल, काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी माॅन्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याचा आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसाचा अंदाज गुरुवारी जाहीर केला. ते म्हणाले, यंदा देशामध्ये जून आणि जुलै महिन्यात सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा १.८ टक्के अधिक राहिले आहे. तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा १८.४ टक्के पाऊस झाला.  

जुलै महिन्यातील पावसामुळे झालेले नुकसान

जिल्ह्याची    बाधित शेती    किती      पशुधन     पुरातून बाहेर    मालमत्तांचेस्थिती    हेक्टरमध्ये    झाले मृत्यू    दगावले     काढले     नुकसान नागपूर    २२८    १०    २८    २००    १४,५९१  भंडारा    २३,२६०    ०४    ३३    २,७१९    २,९३७गडचिरोली    १४,०७६    ०८    ६१    १८०    १,०६४गोंदिया    २,८९५    ०५    २५    ००    १,३६८चंद्रपूर    २३,८४६    ०५    ७०    ६७    २,९९५  वर्धा    ११,१९४    ०१    २३    ०३    ६३३बुलढाणा    १०,५४६    ००    ०४    ५९३    ९२  यवतमाळ    ३,१००    ०७    ४६    ०२    ४१५पुणे    ५७४.९१    ०९    १५    ४,४३५    १,०००कोल्हापूर    २५,०००    ००    १३    ४६३    २,४५८सांगली    ५,२२१    ०२    ००    ०४    ३११रायगड    ७४६    ०४    १८    १,७४७    ५९६रत्नागिरी    ३८१    ०५    १८    ०८    ७३३सिंधुदुर्ग    ५००    ०३    ३,२००    ६२०    १,०५०अकोला    ३,१४२    ०५    ००    ००    ४२सातारा    ५४    ०४    १३    ००    २०७अहमदनगर    ८२    ०१    ०६    ०२    ०७   नंदुरबार    ८०    ०१    ११२    ००    ३८ 

 

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊसMaharashtraमहाराष्ट्र