शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

लोककल्याणाची कामे प्रभावीपणे राबविण्यास राज्य सरकारचे प्राधान्य: मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 22:51 IST

विभागीय अधिकाऱ्यांनी वारंवार क्षेत्र भेटी द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना दिल्या.

"गेल्या 180 दिवसांत राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण कामगिरी झाल्या आहेत, उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने सरकारने लोककल्याणाचे उपक्रम प्रभावीपणे राबवावेत आणि राज्याने विकासाच्या वाटेवर सातत्याने वाटचाल करावी, हा आमचा उद्देश आहे. यासाठी मंत्र्यांच्या संबंधित विभागांच्या आगामी कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सुशासन हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, ते जमिनीवर योग्य स्वरूपात राबविणे हे विभागांचे उद्दिष्ट असले पाहिजे, अशा सूचना आज मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना दिल्या.

 राज्य सरकारच्या गेल्या ६ महिन्यांतील महत्त्वाच्या विभागीय कामगिरीबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीचे आयोजित केली होती. मुख्यमंत्री डॉ. यादव यांनी पीएमएसश्री पर्यटन हवाई सेवेचे डिजिटली उद्घाटनही केले. या बैठकीला मंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिव उपस्थित होते. लोकांना सरकारी कार्यालयात अनावश्यक फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, याची खातरजमा विभागाने करावी. विकासकामांना विनाकारण दिरंगाई होता कामा नये, प्रत्येक स्तरावर जलदगतीने निर्णय घेऊन कामे मुदतीत पूर्ण करून पूर्ण पारदर्शकतेने कामे पूर्ण करावीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशने 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोत्तम योगदान दिले पाहिजे, असंही मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणाले.

मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणाले, गुढीपाडव्यापासून सुरू झालेले हे वर्ष राज्यात गोरक्षण वर्ष म्हणून साजरे होत आहे, ही आनंदाची बाब आहे. राज्य सरकारनेही गो आश्रयस्थानांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असून, हे मानधन देशातील सर्वाधिक असेल. राज्यात प्रादेशिक स्तरावर गुंतवणूकदार समिट आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे प्रदेश आधारित उद्योगांना प्रोत्साहन मिळून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. राज्याचा कृषी विकास दर सुधारला आहे, असंही सीएम डॉ. यादव म्हणाले. 

"उद्योग क्षेत्रातही प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. एमएसएमई तसेच कुटीर उद्योग आणि हस्तकला आणि राज्याची ओळख प्रस्थापित करणाऱ्या इतर औद्योगिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातील. या अंतर्गत विक्रमादित्य संशोधन संस्था, उज्जैन हे दगडी मूर्ती बनवण्याचे केंद्र म्हणून विकसित केले जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिली.

सर्व लोकसभा मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार

"राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यांच्या आणि विभागांच्या सीमारेषा पुनर्रचित करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम बनविण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांचे एकत्रिकरण करणे आणि खासगी आरोग्य संस्थांना सार्वजनिक आरोग्याशी जोडण्याचे कामही केले जात आहे. राज्यातील सर्व 29 लोकसभा मतदारसंघात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आरोग्य क्षेत्रात अनेक नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत, असंही मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश