शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

'काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड; त्यांच्याकडे भविष्याचा विचार नाही'- PM मोदी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 13:25 IST

PM Modi Statement: 'चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांसाठी गरिबांचे जीवन पर्यटन आहे. त्यांच्यासाठी झोपडपट्टी पिकनिक आणि व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण बनले आहे.'

Narendra Modi MP Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भोपाळमधील सभेत लोकांना संबोधित करताना काँग्रेसला गंजलेले लोखंड म्हटले. तसेच, काँग्रेस (Congress) जिकडे गेली, त्या राज्याची नासधूस केली. पक्षाकडे भविष्याचा विचार नाही. विकासाच्या प्रत्येक प्रकल्पावर काँग्रेस टीका करते. भारताचे यश काँग्रेसला आवडत नाही. काँग्रेसला देशाला पुन्हा विसाव्या शतकात घेऊन जायचे आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

काँग्रेस राज्याची नासधूस करेलभोपाळमध्ये 'कर्त्यकर्ता महाकुंभ'ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशातील काँग्रेस राजवटीचे वैशिष्ट्य म्हणजे रणनीती, कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि गैरकारभार होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात दीर्घकाळ राज्य केले, पण संसाधनांनी समृद्ध मध्य प्रदेशला काँग्रेसने आजारी बनवले. तरुणांनी मध्य प्रदेशला गहू उत्पादक राज्य म्हणून पाहिले आहे. तरुणांनी मध्य प्रदेशकडे शिक्षणाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून पाहिले आहे. आगामी निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसला संधी मिळाली, तिथे काँग्रेसने नासधूस केली. आगामी काही वर्षे मध्य प्रदेशच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मध्य प्रदेश विकसित बनवण्याची हीच वेळ आहे, असंही मोदी म्हणाले.

हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पक्ष...पीएम मोदी पुढे म्हणाले की, अशा महत्त्वाच्या वेळी काँग्रेससारखा घराणेशाही पक्ष, हजारो कोटींच्या घोटाळ्यांचा इतिहास रचणारा पक्ष, व्होटबँक खुश करणार्‍या पक्षाला संधी मिळाली, तर मध्य प्रदेशाचे मोठे नुकसान होईल. काँग्रेसने लोकशाहीला कुटुंबव्यवस्था म्हटले. काँग्रेसचे राजकारण गरिबी आणि वंचितांवर फोफावते. ज्यांच्याकडून त्यांना मते मिळाली, त्यांनाच लाभ द्यायचा. आज जग भारताविषयी जे काही बोलले जाते, ते याआधीही बोलले गेले असते, पण काँग्रेस केवळ एका कुटुंबाचे गुणगान करण्यात व्यस्त राहिली. काँग्रेसने भारतातील भ्रष्ट व्यवस्थेचे पोषण केले. काँग्रेसने अशी व्यवस्था निर्माण केली की, व्यवस्थेने नेहमीच गरिबांना हात पसरवण्यास भाग पाडले. काँग्रेसने देशाला अन्न, वस्त्र, निवारा यात अडकवून ठेवले. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना या अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी भाजप सरकार सतत काम करत आहे. 

गरिबांचे शेत काँग्रेससाठी फोटोसेशनचे मैदानकाँग्रेस अजूनही त्याच मानसिकतेत आहे. चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांना गरिबांचे काही देणं-घेणं नाही. काँग्रेस नेत्यांसाठी गरिबांचे जीवन पर्यटन आहे. त्यांच्यासाठी ही झोपडपट्टी पिकनिक आणि व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण बनले आहे. गरीब शेतकऱ्याचे शेत काँग्रेससाठी फोटो सेशनचे मैदान बनले आहे. यापूर्वीही त्यांनी असेच केले होते, आजही ते तेच करत आहेत. महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे गर्विष्ठ मित्र हा कायदा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची विचारसरणी आजही बदललेली नाही, हे लोक खूप अस्वस्थ आहेत. काँग्रेसचे लोक फक्त नकारात्मकता पसरवतात. काँग्रेसला ना स्वतःला बदलायचे आहे ना देश बदलू द्यायचा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण