शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

'काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड; त्यांच्याकडे भविष्याचा विचार नाही'- PM मोदी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 13:25 IST

PM Modi Statement: 'चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांसाठी गरिबांचे जीवन पर्यटन आहे. त्यांच्यासाठी झोपडपट्टी पिकनिक आणि व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण बनले आहे.'

Narendra Modi MP Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भोपाळमधील सभेत लोकांना संबोधित करताना काँग्रेसला गंजलेले लोखंड म्हटले. तसेच, काँग्रेस (Congress) जिकडे गेली, त्या राज्याची नासधूस केली. पक्षाकडे भविष्याचा विचार नाही. विकासाच्या प्रत्येक प्रकल्पावर काँग्रेस टीका करते. भारताचे यश काँग्रेसला आवडत नाही. काँग्रेसला देशाला पुन्हा विसाव्या शतकात घेऊन जायचे आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.

काँग्रेस राज्याची नासधूस करेलभोपाळमध्ये 'कर्त्यकर्ता महाकुंभ'ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मध्य प्रदेशातील काँग्रेस राजवटीचे वैशिष्ट्य म्हणजे रणनीती, कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि गैरकारभार होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात दीर्घकाळ राज्य केले, पण संसाधनांनी समृद्ध मध्य प्रदेशला काँग्रेसने आजारी बनवले. तरुणांनी मध्य प्रदेशला गहू उत्पादक राज्य म्हणून पाहिले आहे. तरुणांनी मध्य प्रदेशकडे शिक्षणाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून पाहिले आहे. आगामी निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसला संधी मिळाली, तिथे काँग्रेसने नासधूस केली. आगामी काही वर्षे मध्य प्रदेशच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मध्य प्रदेश विकसित बनवण्याची हीच वेळ आहे, असंही मोदी म्हणाले.

हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पक्ष...पीएम मोदी पुढे म्हणाले की, अशा महत्त्वाच्या वेळी काँग्रेससारखा घराणेशाही पक्ष, हजारो कोटींच्या घोटाळ्यांचा इतिहास रचणारा पक्ष, व्होटबँक खुश करणार्‍या पक्षाला संधी मिळाली, तर मध्य प्रदेशाचे मोठे नुकसान होईल. काँग्रेसने लोकशाहीला कुटुंबव्यवस्था म्हटले. काँग्रेसचे राजकारण गरिबी आणि वंचितांवर फोफावते. ज्यांच्याकडून त्यांना मते मिळाली, त्यांनाच लाभ द्यायचा. आज जग भारताविषयी जे काही बोलले जाते, ते याआधीही बोलले गेले असते, पण काँग्रेस केवळ एका कुटुंबाचे गुणगान करण्यात व्यस्त राहिली. काँग्रेसने भारतातील भ्रष्ट व्यवस्थेचे पोषण केले. काँग्रेसने अशी व्यवस्था निर्माण केली की, व्यवस्थेने नेहमीच गरिबांना हात पसरवण्यास भाग पाडले. काँग्रेसने देशाला अन्न, वस्त्र, निवारा यात अडकवून ठेवले. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना या अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी भाजप सरकार सतत काम करत आहे. 

गरिबांचे शेत काँग्रेससाठी फोटोसेशनचे मैदानकाँग्रेस अजूनही त्याच मानसिकतेत आहे. चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या त्यांच्या नेत्यांना गरिबांचे काही देणं-घेणं नाही. काँग्रेस नेत्यांसाठी गरिबांचे जीवन पर्यटन आहे. त्यांच्यासाठी ही झोपडपट्टी पिकनिक आणि व्हिडिओ शूटिंगचे ठिकाण बनले आहे. गरीब शेतकऱ्याचे शेत काँग्रेससाठी फोटो सेशनचे मैदान बनले आहे. यापूर्वीही त्यांनी असेच केले होते, आजही ते तेच करत आहेत. महिला आरक्षण विधेयकावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे गर्विष्ठ मित्र हा कायदा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांची विचारसरणी आजही बदललेली नाही, हे लोक खूप अस्वस्थ आहेत. काँग्रेसचे लोक फक्त नकारात्मकता पसरवतात. काँग्रेसला ना स्वतःला बदलायचे आहे ना देश बदलू द्यायचा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण