शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लई ऊन आहे बाबा... आता मध्य प्रदेश सरकारनेही ३० जूनपर्यंत दिली शाळांना सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 16:34 IST

मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांनी सांगितले की, जून महिना सुरू झाल्यानंतरही अद्याप उन्हाचा कहर जाणवत असून तापमान कमी झालेलं नाही.

भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शाळांची सुट्टी आणखी काही दिवस वाढवली आहे. जून महिना अर्धा संपल्यानंतरही पावसाचे आगमन झाले नाही, याउलट उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच जाणवत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीतही वाढ करण्यात आली आहे. झारखंड सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीत वाढ केली आहे. तर, मध्य प्रदेश सरकारनेही ३० जूनपर्यंत प्राथमिक शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदरसिंह परमार यांनी सांगितले की, जून महिना सुरू झाल्यानंतरही अद्याप उन्हाचा कहर जाणवत असून तापमान कमी झालेलं नाही. त्यामुळे, मध्य प्रदेशातील प्राथमिक शाळांची सुट्टी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची शाळा पुढील 10 दिवसांसाठी सकाळच्या सत्रात भरणार आहे.

उन्हाचा जोर आणि वाढते तापमान लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीला हे तापमान धोकादायक ठरू नये, म्हणून मध्य प्रदेश सरकारने शाळांची सुट्टी जून महिनाअखेरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे, ५ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर, त्यावरील वर्गातील विद्यार्थ्यांची शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही अद्याप पावसाचे आगमन झाले असून उन्हाची तीव्रता प्रकर्षाने दिसून येत आहे. 

दरम्यान, झारखंड राज्यातील केजी ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळा २१ जून पर्यंत बंदच राहणार आहेत. तर इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे शाळा आणि कॉलेजेस सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहतील. राज्यातील सर्वच सरकारी, खासगी आणि सरकारी अनुदान प्राप्त शाळांना लागू करण्यात येत आहेत. या काळात विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीसंदर्भात वेगळा आदेश जारी करण्यात येईल. राज्यात अद्याप असलेल्या कडक उन्हाळ्यामुळे शासनाने हा निर्णय घेतल्याचे रवि कुमार यांनी सांगितले. 

टॅग्स :SchoolशाळाMadhya Pradeshमध्य प्रदेशministerमंत्रीStudentविद्यार्थी