शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात काँग्रेस विजयी तरीही कमलनाथांची चिंता वाढली; इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 13:11 IST

कमलनाथ यांच्या भीतीचे एक मोठे कारण म्हणजे कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या जी स्थिती आहे. ती २०१८ च्या मध्य प्रदेशातील परिस्थितीशी जुळते.

भोपाळ - कर्नाटक विधानसभेचा निकाल अखेर हाती आला असून यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने राज्यासह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. परंतु कर्नाटकच्या विजयानंतरही मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना वेगळीच चिंता लागली आहे. भाजपा कर्नाटकात घोडेबाजार करू शकते याची भीती कमलनाथ यांना आहे. 

या निकालावर प्रतिक्रिया देताना कमलनाथ म्हणाले की, काँग्रेसचा विजय निश्चित आहे. मात्र पराभवानंतरही भाजपा कर्नाटकात घोडेबाजार करू शकते. फोडाफोडीचे राजकारण करत भाजपा सरकार बनवण्याचा प्रयत्न करू शकते असंही त्यांनी म्हटलं. कमलनाथ यांच्या भीतीचे कारण जवळपास ३ वर्षापूर्वी मध्य प्रदेशात घडलेल्या राजकीय घटनांमुळे आहे जेव्हा कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात यश मिळाल्यानंतर काँग्रेसने मध्य प्रदेशात सरकार बनवले परंतु अवघ्या १५ महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसचे २४ हून अधिक आमदार फुटले आणि कमलनाथ सरकारने बहुमत गमावले. विश्वासदर्शक ठरावात अपयश आल्याने कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर राज्यात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री झाले. भाजपा घोडेबाजार करून सरकार बनवते असा आरोप काँग्रेस तेव्हापासून करतेय. 

कमलनाथ यांच्या भीतीचे एक मोठे कारण म्हणजे कर्नाटक काँग्रेसमध्ये सध्या जी स्थिती आहे. ती २०१८ च्या मध्य प्रदेशातील परिस्थितीशी जुळते. कर्नाटकात मुख्यमंत्रिपदाचे २ प्रमुख दावेदार आहेत. त्यात एस सिद्धारमैया आणि डी शिवकुमार, या दोन्ही नेत्यांमध्ये तिकीट वाटपावरूनही मतभेद चव्हाट्यावर आले होते. मुख्यमंत्रिपदावरूनही या दोन्ही नेत्यांमध्ये चढाओढ आहे. अशीच स्थिती २०१८ मध्ये मध्य प्रदेशात होती. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार होते. त्यात हायकमांडने कमलनाथ यांची मुख्यमंत्रिपदाची निवड केली, ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा झटका बसला आणि त्यांनी दीड वर्षातच पक्षाला रामराम केला. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा