शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला माहिती असतं तर...", अखिलेश यादव काँग्रेसवर संतापले; 'इंडिया'त वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 20:51 IST

madhya pradesh election : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. पण, लोकसभेला अजून बराच कालावधी राहिला असतानाच विधानसभेच्या जागांवरून 'इंडिया'त वादाची ठिणगी पडल्याचे दिसते. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2023) तारखा जाहीर झाल्या आहेत. अशातच 'इंडिया' आघाडीचे सदस्य असलेल्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे उघडकीस आले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 'इंडिया' आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. आघाडी केवळ केंद्रीय पातळीवरच झाली असेल तर पक्ष विचार करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

अखिलेश यादव यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले, "विधानसभा स्तरावर आघाडी झाली नाही हे मला माहीत असते तर आमच्या पक्षाचे लोक त्यांना (काँग्रेस) भेटायला कधीच गेले नसते. आम्ही देखील काँग्रेसच्या लोकांना यादी दिली नसती. जर 'इंडिया' ही आघाडी फक्त उत्तर प्रदेशात केंद्रात यश मिळवण्यासाठीच असेल तर त्याचा विचार केला जाईल."

दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मध्य प्रदेशातील १८ जागांवर एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन राज्यातील सत्ताधारी पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतापलेल्या अखिलेश यांनी 'इंडिया' आघाडीबद्दल पुनर्विचार करण्याचे संकेत दिले.

माध्यमांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ जे आता पक्षाच्या राज्य युनिटचे प्रमुख आहेत यांच्याशी बोललो. त्यांनी पक्षाच्या कामगिरीवर चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितले की आमचे आमदार यापूर्वी कोणत्या मतदारसंघातून जिंकले होते याचा विचार व्हावा. तसेच मागील निवडणुकीत दोन नंबरवर असलेल्या 'सपा'च्या उमेदवारांची माहिती देण्यात आली. याबाबत रात्री एक वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. 

सहा जागांसाठी आश्वासन दिले होते - अखिलेश यादव"कमलनाथ यांनी आम्हाला सहा जागांसाठी विचार करू, असे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी उमेदवार जाहीर केले तेव्हा 'सपा'साठी काहीच जागा सोडल्या नाही. जर माहिती असते की राज्यपातळीवर आघाडी नाही तर एकत्रच आलो नसतो. असे कळले असते तर काँग्रेससोबत आलोच नसतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबद्दल विचार केला जाईल. ते आमच्याशी जसे वागतात तसे आम्हीही वागू", असेही अखिलेश यादव यांनी नमूद केले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक