शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
3
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
4
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
5
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
6
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
7
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
8
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
9
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
10
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
11
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
12
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
13
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
14
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
15
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
16
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
17
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
18
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
19
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
20
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

"आम्हाला माहिती असतं तर...", अखिलेश यादव काँग्रेसवर संतापले; 'इंडिया'त वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 20:51 IST

madhya pradesh election : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. पण, लोकसभेला अजून बराच कालावधी राहिला असतानाच विधानसभेच्या जागांवरून 'इंडिया'त वादाची ठिणगी पडल्याचे दिसते. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2023) तारखा जाहीर झाल्या आहेत. अशातच 'इंडिया' आघाडीचे सदस्य असलेल्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे उघडकीस आले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 'इंडिया' आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. आघाडी केवळ केंद्रीय पातळीवरच झाली असेल तर पक्ष विचार करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

अखिलेश यादव यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले, "विधानसभा स्तरावर आघाडी झाली नाही हे मला माहीत असते तर आमच्या पक्षाचे लोक त्यांना (काँग्रेस) भेटायला कधीच गेले नसते. आम्ही देखील काँग्रेसच्या लोकांना यादी दिली नसती. जर 'इंडिया' ही आघाडी फक्त उत्तर प्रदेशात केंद्रात यश मिळवण्यासाठीच असेल तर त्याचा विचार केला जाईल."

दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मध्य प्रदेशातील १८ जागांवर एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन राज्यातील सत्ताधारी पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतापलेल्या अखिलेश यांनी 'इंडिया' आघाडीबद्दल पुनर्विचार करण्याचे संकेत दिले.

माध्यमांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ जे आता पक्षाच्या राज्य युनिटचे प्रमुख आहेत यांच्याशी बोललो. त्यांनी पक्षाच्या कामगिरीवर चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितले की आमचे आमदार यापूर्वी कोणत्या मतदारसंघातून जिंकले होते याचा विचार व्हावा. तसेच मागील निवडणुकीत दोन नंबरवर असलेल्या 'सपा'च्या उमेदवारांची माहिती देण्यात आली. याबाबत रात्री एक वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. 

सहा जागांसाठी आश्वासन दिले होते - अखिलेश यादव"कमलनाथ यांनी आम्हाला सहा जागांसाठी विचार करू, असे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी उमेदवार जाहीर केले तेव्हा 'सपा'साठी काहीच जागा सोडल्या नाही. जर माहिती असते की राज्यपातळीवर आघाडी नाही तर एकत्रच आलो नसतो. असे कळले असते तर काँग्रेससोबत आलोच नसतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबद्दल विचार केला जाईल. ते आमच्याशी जसे वागतात तसे आम्हीही वागू", असेही अखिलेश यादव यांनी नमूद केले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक