शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

"आम्हाला माहिती असतं तर...", अखिलेश यादव काँग्रेसवर संतापले; 'इंडिया'त वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 20:51 IST

madhya pradesh election : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकजुट दाखवली असून 'इंडिया' या आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. पण, लोकसभेला अजून बराच कालावधी राहिला असतानाच विधानसभेच्या जागांवरून 'इंडिया'त वादाची ठिणगी पडल्याचे दिसते. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2023) तारखा जाहीर झाल्या आहेत. अशातच 'इंडिया' आघाडीचे सदस्य असलेल्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे उघडकीस आले आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 'इंडिया' आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. आघाडी केवळ केंद्रीय पातळीवरच झाली असेल तर पक्ष विचार करेल, असे त्यांनी म्हटले आहे.

अखिलेश यादव यांनी एका सभेला संबोधित करताना म्हटले, "विधानसभा स्तरावर आघाडी झाली नाही हे मला माहीत असते तर आमच्या पक्षाचे लोक त्यांना (काँग्रेस) भेटायला कधीच गेले नसते. आम्ही देखील काँग्रेसच्या लोकांना यादी दिली नसती. जर 'इंडिया' ही आघाडी फक्त उत्तर प्रदेशात केंद्रात यश मिळवण्यासाठीच असेल तर त्याचा विचार केला जाईल."

दरम्यान, राष्ट्रीय पातळीवर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने मध्य प्रदेशातील १८ जागांवर एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊन राज्यातील सत्ताधारी पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतापलेल्या अखिलेश यांनी 'इंडिया' आघाडीबद्दल पुनर्विचार करण्याचे संकेत दिले.

माध्यमांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ जे आता पक्षाच्या राज्य युनिटचे प्रमुख आहेत यांच्याशी बोललो. त्यांनी पक्षाच्या कामगिरीवर चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितले की आमचे आमदार यापूर्वी कोणत्या मतदारसंघातून जिंकले होते याचा विचार व्हावा. तसेच मागील निवडणुकीत दोन नंबरवर असलेल्या 'सपा'च्या उमेदवारांची माहिती देण्यात आली. याबाबत रात्री एक वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. 

सहा जागांसाठी आश्वासन दिले होते - अखिलेश यादव"कमलनाथ यांनी आम्हाला सहा जागांसाठी विचार करू, असे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी उमेदवार जाहीर केले तेव्हा 'सपा'साठी काहीच जागा सोडल्या नाही. जर माहिती असते की राज्यपातळीवर आघाडी नाही तर एकत्रच आलो नसतो. असे कळले असते तर काँग्रेससोबत आलोच नसतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबद्दल विचार केला जाईल. ते आमच्याशी जसे वागतात तसे आम्हीही वागू", असेही अखिलेश यादव यांनी नमूद केले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक