शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

धुलिवंदनाला कसले रंग खेळता रे?...रंगपंचमी विसरलात का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 15:57 IST

मुंबई , पुणे आदी शहरांत बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आदी ठिकाणांहून नोकरी, शिक्षणासाठी मुले येऊ लागली आणि सुरू झाली सण , उत्सव, परंपरा यांची सरमिसळ.

आठवतंय.... माझ्या लहानपणीरंगपंचमीलाच मोठ्या धुमधडाक्यात रंगपंचमी साजरी केली जाते असे. चुकूनही धुलिवंदनला रंग खेळणारे कुणी दिसत नसत.  समजा कुणी दिसलेच तर घरातली, आजूबाजूची वडीलधारी माणसे त्यांचे चांगलेच कान उपटत. रंगपंचमी अजून लांब आहे, तेव्हा खेळ रंग असे सांगत. पण गेल्या काही वर्षात हा ट्रेंड बदलतोय. हळूहळू रंगपंचमी ऐवजी धूलिवंदन साजरे करण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे मुंबई , पुणे आदी शहरांत बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आदी ठिकाणांहून नोकरी, शिक्षणासाठी मुले येऊ लागली आणि सुरू झाली सण , उत्सव, परंपरा यांची सरमिसळ.

त्यांचे सण- उत्सव साजरे करण्यात गैर काहीच नाही. पण त्यात आपल्या मूळ सणांची गळचेपी किंवा त्यांना दुय्यम स्थान का?, असा प्रश्न उभा राहतो. ते लोक कधीच रंगपंचमीला आपण रंग खेळू, असे म्हणताना आढळून येत नाहीत. खरे तर पुन्हा आपण सर्व भारतीय आहोत, प्रादेशिक , परप्रांतीय वादांना खतपाणी किंवा मनसेच्या ओंजळीने पाणी पिणारे अशाही काही प्रतिक्रिया, भावना अनेकांच्या मनात येऊ शकतात. पण मित्रांनो, मुळात आधीच आपल्या प्रत्येक सणांचे सध्या इव्हेंट होत आहे. त्यातील मतितार्थाशी कुणाला काही एक देणे घेणे नाही. त्यात परत असे आपल्या सणांवर होणारे एक एक अतिक्रमण.

शाळा , कॉलेज, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी धुलिवंदनलाच सुट्टी असते. त्यामुळे त्याच दिवशी रंग खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुद्धा रंगपंचमी आणि धूलिवंदन यातले धूलिवंदनच जवळ वाटते. रंगपंचमी कधी येते आणि कधी जाते याची त्यांना कल्पना देखील नसते. धुळवड वेगळी आणि रंगपंचमी वेगळी, हा फरकही अनेकांना माहीत नसेल. या सर्व बदललेल्या परिस्थितीत आपण तरी निदान आपल्या सणांची प्रतिष्ठा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. प्रांताप्रांतात भेदाभेद करणे हा मुद्दाच इथे नाहीये. पण कुठे तरी आपल्या सणांवर गदा येत आहे याचे शल्य मनात घर करून आहे. 

पुणे - मुंबई सारखी शहरे सोडा आता तर खेडेगावांकडे सुद्धा धुलिवंदनलाच रंग खेळले जातात. असेच वातावरण कायम राहिले तर महाराष्ट्रीय सण काळाच्या पडद्याआड जायला वेळ लागणार नाही. पण या सणांकडे लक्ष द्यायला वेळ कुणाकडे आहे म्हणा. सर्व जण आपापल्या पोटापाण्याच्या धावपळीत व्यग्र आहेत. सण , उत्सवांचे महत्त्व फक्त सुट्टीचा आनंद आणि गोड- धोड खाण्यापुरतेच मर्यादित उरलेय का, असेही काही वेळा मनात येऊन जाते.

टॅग्स :Puneपुणेcolourरंग