शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लाईक्स, कमेंट्स, स्टेटसमध्ये अडकली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST

अहमदपूर : सोशल मीडियामुळे जग जवळ आले असून दूरवरील व्यक्तीसोबतचा संपर्क वाढला आहे. पण, जवळचा दुरावत आहे. कमेंटस्, स्टेटस, ...

अहमदपूर : सोशल मीडियामुळे जग जवळ आले असून दूरवरील व्यक्तीसोबतचा संपर्क वाढला आहे. पण, जवळचा दुरावत आहे. कमेंटस्, स्टेटस, लाईक्सला महत्त्व दिले जात असल्याने तरुणाई त्यात अडकत आहे. परिणामी, मानसिक आरोग्यावर परिणाम हाेत असल्याने पालकांतून चिंता व्यक्त होत आहे.

मोबाईलमुळे अख्खे विश्व जवळ आले आहे. सेल्फी, स्टंट, व्हिडिओ कॉलिंगसाठी तरुण मुले धोक्याच्या स्थळी जात आहेत. त्याचे व्हिडिओ चित्रण करून ते सोशल मीडियावर अपलोड केल्यास जास्त लाईक मिळतात, अशी भावना निर्माण झाली आहे. सोशल मीडियावरील आभासी जीवनाकडे कल वाढला आहे. त्यातूनच काही मुलांमध्ये नकारात्मक, जिद्दीची भावना वाढून सहनशीलता कमी होत आहे.

सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे कमेंट, लाईक्सला महत्त्व दिले जात आहे. इतरांनी आपल्याला चांगले म्हणावे, कौतुक, स्तुती करावी. इतरांपेक्षा वेगळे असावे, काहीतरी वेगळे करावे, अशी धडपड तरुणाई करीत आहे. त्यातून कमी लाईक्स, कमेंट मिळाल्या तर निराशा वाढते आणि जास्त लाईक मिळाल्या की, त्याच विश्वात तरुण गुरफटून जात असल्याचे चित्र आहे. यातून स्वमग्न होणे, एकलकोंडेपणा, निराशा असे परिणाम वाढत आहेत.

दररोज दीड जीबी, अख्खीखी तरूणाई बिझी...

सध्या सर्वत्र मोबाईल इंटरनेटचे आकर्षण मुलांमध्ये वाढत आहे. त्यामुळे मुले मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. बहुतांश घरातील संवाद कमी होत आहे. दररोज दीड जीबी, सारा तालुका बिझी अशी अवस्था झाली आहे. माझा मुलगा छान मोबाईल हाताळतो, त्याला मोबाईल मधलं सगळं काही जमतं अशी कौतुकाची थाप पालकवर्ग मारत आहे. मात्र, मुलं जशी त्यात गुरफटत गेली, तेव्हा पालकांना भीती वाटायला लागली. मुलं आता हाताबाहेर जाऊ लागल्याने पालकांना काय करावे ? असा प्रश्न पडला आहे.

मोबाईलचा अतिवापर...

मोबाईलचे मुलांना व्यसन लागत आहे. त्यामुळे मनाची एकाग्रता कमी होते. सतत मोबाईल वापरामुळे डोक्यावर ताण येऊन डोळ्यावर परिणाम होतो. व्यक्तिमत्त्वात हट्टी व जिद्दीपणा वाढतो. वनवे कम्युनिकेशनमुळे लाईक्स, कमेंट या गोष्टी महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत. सहनशीलता कमी होत जाते.

- डॉ. जयप्रकाश केंद्रे, वैद्यकीय अधिकारी.

मैदानी खेळ आवश्यक...

मैदानी खेळामुळे चिडचिडेपणा दूर होतो. त्याचबरोबर शरीर मजबूत होते.

शिक्षणाबरोबर खेळसुद्धा आवश्यक आहे. आगामी काळात विविध आजारांना समोरे जावे लागणार की काय, अशी भीती आहे. खेळामुळे शरीर व मानसिक ताण दूर होतो. मुलांना मैदानी खेळ आवश्यक आहे.

- प्रा.दत्ता गलाले, क्रीडा प्रक्षिशक.

एकलपणा वाढला...

मुलांमध्ये एकाकीपणा वाढत आहे. खरंतर मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. परंतु, त्यांना खेळण्यासाठी गावात, शहरांमध्ये पुरेसे मैदान नाहीत. सोसायटी, गल्लीत मुले खेळण्यासाठी येत नाहीत. पालकांसोबत पुरेसा संवाद नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात मुलांत एकाकीपणा वाढत चालला आहे.

- जयश्री पवार, सहशिक्षिका