शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जगाला बुद्धांच्या नैतिक सुविचारी शास्त्राची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जगाच्या आरंभी काळापासूनच वेगवेगळे तत्वज्ञान सांगण्याची सुरुवात झाली आहे. कुठे कुठे तर हुकुमशाहीव्दारे शस्त्राच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : जगाच्या आरंभी काळापासूनच वेगवेगळे तत्वज्ञान सांगण्याची सुरुवात झाली आहे. कुठे कुठे तर हुकुमशाहीव्दारे शस्त्राच्या बळाचा वापर जगावर राज्य करण्यासाठी केला आहे. परंतु, प्रत्यक्षात जगाला शस्त्राची नसून, बुद्धांच्या नैतिक सुविचारी शास्त्राची गरज असल्याचे प्रतिपादन भन्ते पय्यानंद यांनी येथे केले.

आषाढ पौर्णिमेनिमित्ताने बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूरतर्फे आयोजित वर्षावास व धम्मदेसन कार्यक्रमात ते बोलत होते. भन्ते पय्यानंद म्हणाले, करुणेचे महासागर तथागत बुद्धांची शिकवण संपूर्ण मानव समूहासाठी असून, ती पूर्णतः सामाजिक आहे. सुविचार आणि नीतीमत्तेने जगाची उभारणी करणे हा सुखमय जगाचा पाया आहे. सुविचारानेच जगाची भविष्यकाळातील वाटचाल होणे अपेक्षित आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातही नैतिक विचारांची गरज जगाला आहे. तथागत बुद्ध हे जगातील सुविचाराचे प्रथम जनक असून, मानवजातीचे गुरु आहेत. तेव्हा बुद्धांचा सुविचारच जगाचा आधार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी भन्ते यशकाश्यपायन महाथेरो, सेवानिवृत्त अधिकारी एम. एन. गायकवाड, गायिका सुमनताई जोगदंड, किशोर चक्रे, कुमार सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन भरत कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले. अनिरुध्द बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग अंबुलगेकर, सुधाकर कांबळे, डॉ. अरुण कांबळे, परमेश्वर आदमाने, उदय सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.