शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शिपाई, लिपिक अन् व्यवस्थापकाचेही काम एकाच कर्मचाऱ्यावर

By आशपाक पठाण | Updated: October 11, 2023 22:18 IST

मौलाना आझाद महामंडळ : बैठक, कर्ज वसुलीसाठी गेले की कार्यालय कुलूपबंद

आशपाक पठाण /लातूर : मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचा कारभार जवळपास सहा वर्षांपासून एकाच कर्मचाऱ्यावर आहे. सहायक व्यवस्थापक दोन, लिपिक, शिपायाचे पद मंजूर असतानाही कर्मचारी दिले जात आहे. प्रशासकीय बैठक, कर्ज वसुली, मेळावा, अर्ज पडताळणीसाठी जायचे असेल तर चक्क कार्यालयाला कुलूप लावले जाते. त्यातही लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, म्हणून व्यवस्थापक संपर्कासाठी फलक लावून बाहेर पडतात.

अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक विकासासाठी महामंडळाकडून विविध कर्ज योजना चालविल्या जातात. मात्र, राज्य सरकार व प्रशासकीय अनास्थेमुळे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयांना व्यवस्थित जागाही मिळत नाही. २०१५ पासून लातूरच्या कार्यालयात येणाऱ्या लाभार्थ्यांना किमान चारवेळा कार्यालयाचा पत्ता विचारावा लागतो. बरं कार्यालय सापडले तर व्यवस्थापक भेटतीलच याची खात्रीही नाही. कारण एकाच व्यक्तीला सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात, हे विशेष. कर्ज प्रस्तावाच्या माहितीसाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना किमान दोन चार खेटे मारावे लागतात, हा सर्व प्रकार वर्षानुवर्षे सुरू असताना केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे अल्पसंख्याक योजनांच्या अंमलबजावणीत अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून कार्यालयीन व्यवस्थापकांना काम करावे लागते.

पाचपैकी चार पदे रिक्तच...

लातूरच्या जिल्हा कार्यालयाला पाच पदे मंजूर आहेत. त्यात दोन सहायक व्यवस्थापक, एक लिपिक व एका शिपायाचा समावेश आहे. मात्र, ६ वर्षांपासून जिल्हा व्यवस्थापकच सर्वच भूमिका बजावतात. पदभरतीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने योजनांची अंमलबजावणी होत नाही. कर्ज प्रस्ताव सादर करायचा असेल किमान चार खेटे मारावे लागतात, असे शहानूर बागवान, मैनोद्दीन शेख यांनी सांगितले.

अल्पसंख्याक योजनांवर शासनाची उदासीनता...शासन अल्पसंख्याक योजनांचा गाजावाजा करते. प्रत्यक्षात अंमलबजावणीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. मागील अनेक वर्षांपासून मौलाना आझाद महामंडळाच्या कार्यालयाला जागा मिळत नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यालय सापडत नाही. सापडले तर कार्यालय सुरू असेल याची खात्री नाही. एकाच कर्मचाऱ्यावर काम सुरू असल्याने याेजनांची अंमलबावणी होणार कशी, असा सवाल मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे राज्य समन्वयक मोहसीन खान,  एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष मुजीब हमदुले यांनी केला आहे.

सहा वर्षांपासून कर्मचारी नाहीत...

२०१५ पासून जिल्हा कार्यालयात ४ जागा रिक्त आहेत. सहायक व्यवस्थापक, क्लार्क, शिपाई नाही. त्यामुळे व्यवस्थापकांना सर्व कामे करावी लागतात. प्रशासकीय बैठक, कर्ज वसुलीसाठी जायचे असेल तर कार्यालयाला कुलूप लावावे लागते. मागील सहा वर्षांपासून ही परिस्थिती आहे. तरीही लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी कार्यालयाबाहेर मोबाइल नंबर लिहून फलक लावले आहे.- अरविंद कांबळे, जिल्हा व्यवस्थापक

टॅग्स :laturलातूर