शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

रानडुकरे, हरणांचा उपद्रव वाढला; उगवलेली पिके खाऊन नष्ट केल्याने शेतकरी संकटात

By संदीप शिंदे | Updated: July 28, 2023 16:07 IST

यासोबतच गोगलगाय व बंदे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

उदगीर : रानडुकरे व हरणांचे कळप शेतात पेरणी केलेले सोयाबीन व अन्य खरिपाची उगवण झालेली पिके खाऊन नष्ट करीत असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या दोन्ही वन्यजीव प्राण्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची यंत्रणा नसल्यामुळे या दोन्ही प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊन खरिपाची पिके फस्त करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. शिवाय गोगलगाय व बंदे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा खरिपाच्या पेरणीसाठी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मूग, उडीदचा पेरा कमी केला आहे. यामुळे सोयाबीनचा पेरा ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरून ४६ हजार हेक्टरपर्यंत गेला आहे. सोयाबीन व तूर पिकांची उगवण होऊन या पिकांची वाढ सुरू असतानाच रानडुकरे व हरणांचे कळप ही पिके फस्त करीत आहेत. कहर म्हणजे या दोन वन्य प्राण्यांसह गोगलगाय व बंदा नाणे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. हरणांचे कळप व रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उगवण झालेल्या पिकांची पाने खाऊन फस्त करीत आहेत. रानडुकरे या पिकासह उभ्या उसाचे मोठे नुकसान करीत आहेत. सायाळ हे नवीन लागवड केलेली आंबा, वड, पिंपळ, कडूनिंबाची रोपे मुळासकट खाऊन नष्ट करीत आहेत. दरम्यान, वन्यजीवांना कोणालाही पकडता व मारता येत नाही, असे वन परिमंडळ अधिकारी रामेश्वर केसाळे यांनी सांगितले.

सूर्यदर्शन नसल्यामुळे आंतरमशागत थांबली...गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नाही. खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्यामुळे शेतातील आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतातील पिकांच्या खुरपणा व्यतिरिक्त गोगलगाय व बंदे अळी वेचण्यासाठी मजुरांना वेगळी रक्कम मोजावी लागत आहे. तणनाशक फवारणीसाठीही पावसाने उघडीप देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अनुदानाऐवजी तारेचे कुंपण करून द्यावे...शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान देण्याऐवजी त्यांच्या शेतीला तारेचे कुंपण करून देण्यात यावे. वन्यजीवांना पकडता व मारता पण येत नसल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे कुंपण करून द्यावे. शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात मिळणाऱ्या योजनेत शेतीला तारेचे कुंपणाची योजना नसल्यामुळे आजघडीला शेतकऱ्यांना एखादी योजना नाही मिळाली तरी चालेल; मात्र शेतीला तारेच्या कुंपणाची खरी गरज असल्यामुळे शासनाने यावर निर्णय घ्यावा. - बाबासाहेब पाटील, शेतकरी, हेर

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी