शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरे, हरणांचा उपद्रव वाढला; उगवलेली पिके खाऊन नष्ट केल्याने शेतकरी संकटात

By संदीप शिंदे | Updated: July 28, 2023 16:07 IST

यासोबतच गोगलगाय व बंदे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

उदगीर : रानडुकरे व हरणांचे कळप शेतात पेरणी केलेले सोयाबीन व अन्य खरिपाची उगवण झालेली पिके खाऊन नष्ट करीत असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या दोन्ही वन्यजीव प्राण्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करण्याची यंत्रणा नसल्यामुळे या दोन्ही प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊन खरिपाची पिके फस्त करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. शिवाय गोगलगाय व बंदे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

यंदा खरिपाच्या पेरणीसाठी पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मूग, उडीदचा पेरा कमी केला आहे. यामुळे सोयाबीनचा पेरा ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरून ४६ हजार हेक्टरपर्यंत गेला आहे. सोयाबीन व तूर पिकांची उगवण होऊन या पिकांची वाढ सुरू असतानाच रानडुकरे व हरणांचे कळप ही पिके फस्त करीत आहेत. कहर म्हणजे या दोन वन्य प्राण्यांसह गोगलगाय व बंदा नाणे अळींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. हरणांचे कळप व रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उगवण झालेल्या पिकांची पाने खाऊन फस्त करीत आहेत. रानडुकरे या पिकासह उभ्या उसाचे मोठे नुकसान करीत आहेत. सायाळ हे नवीन लागवड केलेली आंबा, वड, पिंपळ, कडूनिंबाची रोपे मुळासकट खाऊन नष्ट करीत आहेत. दरम्यान, वन्यजीवांना कोणालाही पकडता व मारता येत नाही, असे वन परिमंडळ अधिकारी रामेश्वर केसाळे यांनी सांगितले.

सूर्यदर्शन नसल्यामुळे आंतरमशागत थांबली...गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे सूर्यदर्शन झाले नाही. खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्यामुळे शेतातील आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतातील पिकांच्या खुरपणा व्यतिरिक्त गोगलगाय व बंदे अळी वेचण्यासाठी मजुरांना वेगळी रक्कम मोजावी लागत आहे. तणनाशक फवारणीसाठीही पावसाने उघडीप देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अनुदानाऐवजी तारेचे कुंपण करून द्यावे...शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान देण्याऐवजी त्यांच्या शेतीला तारेचे कुंपण करून देण्यात यावे. वन्यजीवांना पकडता व मारता पण येत नसल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे कुंपण करून द्यावे. शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात मिळणाऱ्या योजनेत शेतीला तारेचे कुंपणाची योजना नसल्यामुळे आजघडीला शेतकऱ्यांना एखादी योजना नाही मिळाली तरी चालेल; मात्र शेतीला तारेच्या कुंपणाची खरी गरज असल्यामुळे शासनाने यावर निर्णय घ्यावा. - बाबासाहेब पाटील, शेतकरी, हेर

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी