शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लातूरसाठी आम्ही 'विमानानंही' पाणी आणू शकतो, भाजपा खासदार 'हवेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 16:44 IST

भाजपा खासदार सुनिल गायकवाड यांनी लातूरमधील पाणीप्रश्नावर हवेत विधान केलं आहे.

लातूर - भाजपा खासदार सुनिल गायकवाड यांनी लातूरमधीलपाणीप्रश्नावर हवेत विधान केलं आहे. लातूरकरांच्या पाणीप्रश्नाबाबत गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना 2016 मध्ये ट्रेनने लातूरला पाणी आणलं, आता आम्ही विमानानेही पाणी आणू शकतो. मात्र, ती वेळ येणार नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांचे हे विधान हवेत बोलल्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक विरोधकांकडून व्यक्त होत आहे. 

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एखाद्या दुष्काळग्रस्त जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. 2016 साली मिरजहून रेल्वेद्वारे लातूरमध्ये पाणी आणण्यात आले. जिल्ह्यात टंचाई काळात पाणीस्त्रोत उपलब्ध नसल्याने थेट उजनीहून पाणीपुरवठा करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, बैठकावर बैठका आणि प्रस्तावांचा ढीग मंत्रालयात सादर करूनही ही योजना काही मार्गी लागली नाही. त्यामुळे लातूरमध्ये पुन्हा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असले तरी एप्रिल, मे महिन्यातील उन्हाळ्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न होणार असल्याचे दिसून येते. सध्यातरी पाणीटंचाई नाही, पण मार्चनंतर पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे ऊस उत्पादक गावात गरज भासल्यास टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे गायकवाड यांनी म्हटले. तसेच लातूर शहरात पाण्याचं नियोजन व्यवस्थीत झालं नाही. वेस्टेज ऑफ वॉटरमुळे शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळी परीस्थितीमध्ये चारा अन् पिण्याचं पाणी हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच, 2016 मध्ये आम्ही ट्रेनने पाणी आणलं, आता विमानानेही आम्ही पाणी आणू शकतो. पण, त्याची गरज नाही, असे गायकवाड यांनी म्हटले. दरम्यान, खासदार सुनिल गायकवाड यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.  

टॅग्स :BJPभाजपाSunil Gaikwadसुनिल गायकवाडlaturलातूरWaterपाणी