शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे स्रोत अटले; पावसाअभावी ऊसाची होतेय वैरण, तेलबिया वाण नामशेष होण्याची भीती

By संदीप शिंदे | Updated: July 14, 2023 19:38 IST

औशात पाण्याची स्थिती बिकट; काळे ढग आणि वारे असल्याने शेतकरी हवालदिल

औसा : जून महिना संपला, जुलैचा मध्यावधी आला तरीदेखील औसा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या ४५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहे. ज्यांनी पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांना पिके कशी वाचवावी याची चिंता आहे. दररोज आकाशात काळे ढग आणि सुसाट वाऱ्याने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. बहुतांश पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडल्याने फडातल्या उसाचे पाचट झाले असून, त्याची वैरण करून जनावरांना टाकण्यात येत आहे. परिणामी तालुक्यातील स्थिती बिकट झाली आहे.

औसा तालुका मागासलेला तालुका असून दरवर्षी पर्जन्यमान कमीच होते. यासह या भागात धरण, मोठे तलाव, उपसा सिंचनामुळे ओलिताखाली क्षेत्र वाढेल, असा पर्यायच नसल्याने सततच दुष्काळांशी झुंज द्यावी लागते. पाऊस चांगला झाला तरच शेती अन्यथा सर्वत्र वाळवंट असते. यंदा तर स्थिती बिकट असून पावसाळा सुरू होऊन ४० दिवस झाले, दोन नक्षत्र कोरडीच गेली आहेत. आतापर्यंत तालुक्यात ७० मि.मी. पाऊस झाला. तो गतवर्षीच्या तुलनेत निम्माच असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांचे वार्षिक अंदाज चुकताना दिसत आहे. एकरी १० हजारांचा खर्च करून कमी पावसावरच ५५ टक्के म्हणजेच ६१ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. पण, त्यातही बहुतांश ठिकाणी बियाणे उगवण झाली नाही. यंदा सर्वाधिक ९० टक्के पेरा सोयाबीनचा असून मूग व उडिदाच्या पेऱ्यात कमालीची घट झाली. जुलैचा मध्यावधी उजाडला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. बहुतांश जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

भुईमुगासह तीळ, सूर्यफूल नामशेष?तालुक्यात सध्या झालेल्या पेऱ्यामध्ये गळीत धान्यात समावेश असणाऱ्या भुईमूग, सूर्यफूल, तीळ आणि कारळे यांचा पेरा शून्य आहे. उर्वरित पेरणीत या पिकांचा समावेश होईल याची शाश्वती वाटत नसल्याने हे वाण नामशेष होतील? अशी भीती आहे. हे वाण स्वयंपाक घरातील महत्त्वाचे असून देखील १ लाख हेक्टर होणाऱ्या पेऱ्यात यांचा टक्का शून्य असल्याने ही चिंतेची बाब आहे.

तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या...२०१६ ते १८-१९ या वर्षांत अनुक्रमे ३५, ३३, ३१ शेतकऱ्यांनी दुष्काळ, नापिकी आणि सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. हा आकडा मराठवाड्यात सर्वाधिक होता. २०१५ पासून यात चढ-उतार आहेत. यात २०१५ मध्ये २७, २०१६-३५, २०१७-२३, २०१८-३१, २०१९-३३, २०२०-२४, २०२१-२१, २०२२-१२ आणि चालू वर्षात आतापर्यंत ०५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी