शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पाण्याचे स्रोत अटले; पावसाअभावी ऊसाची होतेय वैरण, तेलबिया वाण नामशेष होण्याची भीती

By संदीप शिंदे | Updated: July 14, 2023 19:38 IST

औशात पाण्याची स्थिती बिकट; काळे ढग आणि वारे असल्याने शेतकरी हवालदिल

औसा : जून महिना संपला, जुलैचा मध्यावधी आला तरीदेखील औसा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या ४५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहे. ज्यांनी पेरण्या केल्या त्या शेतकऱ्यांना पिके कशी वाचवावी याची चिंता आहे. दररोज आकाशात काळे ढग आणि सुसाट वाऱ्याने शेतकऱ्यांची झोप उडविली आहे. बहुतांश पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडल्याने फडातल्या उसाचे पाचट झाले असून, त्याची वैरण करून जनावरांना टाकण्यात येत आहे. परिणामी तालुक्यातील स्थिती बिकट झाली आहे.

औसा तालुका मागासलेला तालुका असून दरवर्षी पर्जन्यमान कमीच होते. यासह या भागात धरण, मोठे तलाव, उपसा सिंचनामुळे ओलिताखाली क्षेत्र वाढेल, असा पर्यायच नसल्याने सततच दुष्काळांशी झुंज द्यावी लागते. पाऊस चांगला झाला तरच शेती अन्यथा सर्वत्र वाळवंट असते. यंदा तर स्थिती बिकट असून पावसाळा सुरू होऊन ४० दिवस झाले, दोन नक्षत्र कोरडीच गेली आहेत. आतापर्यंत तालुक्यात ७० मि.मी. पाऊस झाला. तो गतवर्षीच्या तुलनेत निम्माच असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांचे वार्षिक अंदाज चुकताना दिसत आहे. एकरी १० हजारांचा खर्च करून कमी पावसावरच ५५ टक्के म्हणजेच ६१ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. पण, त्यातही बहुतांश ठिकाणी बियाणे उगवण झाली नाही. यंदा सर्वाधिक ९० टक्के पेरा सोयाबीनचा असून मूग व उडिदाच्या पेऱ्यात कमालीची घट झाली. जुलैचा मध्यावधी उजाडला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहे. बहुतांश जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा असून, शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

भुईमुगासह तीळ, सूर्यफूल नामशेष?तालुक्यात सध्या झालेल्या पेऱ्यामध्ये गळीत धान्यात समावेश असणाऱ्या भुईमूग, सूर्यफूल, तीळ आणि कारळे यांचा पेरा शून्य आहे. उर्वरित पेरणीत या पिकांचा समावेश होईल याची शाश्वती वाटत नसल्याने हे वाण नामशेष होतील? अशी भीती आहे. हे वाण स्वयंपाक घरातील महत्त्वाचे असून देखील १ लाख हेक्टर होणाऱ्या पेऱ्यात यांचा टक्का शून्य असल्याने ही चिंतेची बाब आहे.

तालुक्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या...२०१६ ते १८-१९ या वर्षांत अनुक्रमे ३५, ३३, ३१ शेतकऱ्यांनी दुष्काळ, नापिकी आणि सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. हा आकडा मराठवाड्यात सर्वाधिक होता. २०१५ पासून यात चढ-उतार आहेत. यात २०१५ मध्ये २७, २०१६-३५, २०१७-२३, २०१८-३१, २०१९-३३, २०२०-२४, २०२१-२१, २०२२-१२ आणि चालू वर्षात आतापर्यंत ०५ शेतकऱ्यांनी जीवन संपवले.

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी