शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

भाजपाच्या जाहीरनाम्याच्या बचावासाठी चक्क उद्धव ठाकरे सरसावले, काँग्रेसला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:30 IST

मराठवाडा ही मर्दांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, रझाकारांविरुद्ध लढणारी ही भूमी आहे.

लातूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लातूर येथील महायुतीच्या सभेत बोलताना भाजपाच्या जाहीरनाम्याचे समर्थन केले आहे. भाजापाने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसने हा जुनाच जाहीरनामा असल्याची टीका केली. त्यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा जाहीरनामा हा तर इंदिरा गांधीच्या काळातीलच असल्याचे म्हटले. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्याबाबत मोदींना धन्यवाद दिले. जाहीरनाम्यातील वचनांमुळेच शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे. राम मंदिर, काश्मीरचे 370 कलम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.  

काँग्रेसने भाजपाच्या जाहीरनाम्यावर टीका केली. पण, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात किती थापा आहेत. इंदिरा गांधींपासून देशात गरिबी आहे. केवळ गांधी घराण्याची गरिबी गेली, पण सर्वसामान्यांची गरिबी कधी जाणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत विचारला. मोदी सरकार हे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारं आहे. पाकिस्तानने कुरापत काढली तर, आम्ही केवळ बोलून दाखवत नाही की ठोकून काढू. आम्ही ते करुन दाखवलं. उरी असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल या सरकारने पाकिस्तानला ठोकून दाखवलं आहे. पाकिस्तानवर एकदाच घाव घाला, की पाकिस्तानचा नामोनिशाण शिल्लक राहता नये, असा तोडगा काढा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली. 

मराठवाडा ही मर्दांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, रझाकारांविरुद्ध लढणारी ही भूमी आहे. वल्लभाई पटेल रझाकार या सुलतानी संकटाशी लढले, आता नरेंद्रभाईंनी असमानी संकटावेळी आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे हीच अपेक्षा असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विमा कंपन्यांचा मुद्दाही उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडला. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस