शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाजपाच्या जाहीरनाम्याच्या बचावासाठी चक्क उद्धव ठाकरे सरसावले, काँग्रेसला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:30 IST

मराठवाडा ही मर्दांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, रझाकारांविरुद्ध लढणारी ही भूमी आहे.

लातूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लातूर येथील महायुतीच्या सभेत बोलताना भाजपाच्या जाहीरनाम्याचे समर्थन केले आहे. भाजापाने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसने हा जुनाच जाहीरनामा असल्याची टीका केली. त्यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा जाहीरनामा हा तर इंदिरा गांधीच्या काळातीलच असल्याचे म्हटले. तसेच भाजपाच्या जाहीरनाम्याबाबत मोदींना धन्यवाद दिले. जाहीरनाम्यातील वचनांमुळेच शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे. राम मंदिर, काश्मीरचे 370 कलम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.  

काँग्रेसने भाजपाच्या जाहीरनाम्यावर टीका केली. पण, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात किती थापा आहेत. इंदिरा गांधींपासून देशात गरिबी आहे. केवळ गांधी घराण्याची गरिबी गेली, पण सर्वसामान्यांची गरिबी कधी जाणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी आपल्या सभेत विचारला. मोदी सरकार हे दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारं आहे. पाकिस्तानने कुरापत काढली तर, आम्ही केवळ बोलून दाखवत नाही की ठोकून काढू. आम्ही ते करुन दाखवलं. उरी असेल, सर्जिकल स्ट्राईक असेल या सरकारने पाकिस्तानला ठोकून दाखवलं आहे. पाकिस्तानवर एकदाच घाव घाला, की पाकिस्तानचा नामोनिशाण शिल्लक राहता नये, असा तोडगा काढा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे केली. 

मराठवाडा ही मर्दांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, रझाकारांविरुद्ध लढणारी ही भूमी आहे. वल्लभाई पटेल रझाकार या सुलतानी संकटाशी लढले, आता नरेंद्रभाईंनी असमानी संकटावेळी आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे हीच अपेक्षा असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विमा कंपन्यांचा मुद्दाही उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडला. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस