शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लातुरात दुचाकी-कंटेनरचा अपघात; धाराशिव जिल्ह्यातील पती-पत्नीचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: April 19, 2024 23:22 IST

याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

लातूर : शहरातील विवेकानंद चाैकाकडून रिंगराेड मार्गाने गावाकडे दुचाकीवरून निघालेले पती-पत्नी कंटेनरच्या अपघातात ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास बाभळगाव नाका येथे घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

पाेलिसांनी सांगितले, धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा येथील रहिवासी मंगेश भानुदास कांबळे (वय ३०) आणि प्रगती मंगेश कांबळे (२४) हे लातुरातील विवेकानंद चाैकातून बाभळगाव नाका परिसरातून रिंगराेडने गावाकडे दुचाकीवरून (एम.एच. १३ ई.ई. १७१२) शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास निघाले हाेते. दरम्यान, बाभळगाव नाका परिसरात कंटेनरच्या (एन.एल. ०१ ए.एफ. ९१२०) अपघातात ते गंभीर जखमी झाले. यामध्ये मंगेश कांबळे हे जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेल्या प्रगती कांबळे यांना शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आले हाेते. मात्र, तेथील डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत झाल्याचे घाेषित केले. घटनास्थळी विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी भेट देऊन पाहणी केली. जखमींना तातडीने लातुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघात स्थळावरून कंटेनर, दुचाकी ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती, असे पाेलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले.

कंटेनरच्या टायरखाली दुचाकी... -बाभळगाव नाका परिसरात कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली दुचाकी चिरडल्याचे समाेर आहे. या अपघातात दाेघेही पती-पत्नी ठार झाल्याचे पाेलिसांनी सांगितले. यात नेमकी काेणाची चूक आहे, याची चाैकशी पाेलिस करीत आहेत. दाेघेही लातुरातून धाराशिवकडे निघाले हाेते. दरम्यान, हा अपघात झाला, असेही पाेलिसांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरPoliceपोलिस