शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

लातूर शहरात दररोज दोनशे टन नवा कचरा; विल्हेवाट नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग

By हणमंत गायकवाड | Published: April 01, 2024 7:38 PM

तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासन आणि जनाधार संस्थेची संयुक्त बैठक

लातूर : शहरात दररोज २०० टन नवा कचरा निर्माण होत असून या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे मनपा प्रशासन आणि कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेची संयुक्त बैठक नुकतीच झाली असून आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासंदर्भात तोडगा काढण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग आठ दिवसांत साफ करण्यासंदर्भात संस्थेला सूचित करण्यात आले आहे. त्यादृष्टीने काम करायला प्रारंभ झाला आहे.

लातूर शहरामध्ये ७८ हजार मालमत्ताधारकांची संख्या होती. ती आता सव्वालाखाच्या घरात गेली आहे. ४८ हजार घरे वाढीव झाली आहेत. यामुळे कचरा वाढला आहे. कचरा वाढल्यामुळे व्यवस्थापन संस्थेवरचा ताण वाढला आहे. ज्या तुलनेत कचरा वाढला. त्या तुलनेत संस्थेकडे मनुष्यबळाची वाढ झालेली नाही. परिणामी, शहरातील कचरा उचलताना अनियमित आली आहे. यामुळे कचरा उचलणारी संस्था आणि मनपा प्रशासनात वाद निर्माण झाला होता.

गल्लीबोळातल्या मोकळ्या जागेत साचला कचरा... लातूर शहरानजीक गेलेल्या रिंगरोड तसेच बार्शी रोडच्या समांतर रस्त्यावर, दयानंद महाविद्यालयाच्या बाजूने असलेल्या भाजीपाल्याच्या रयतू बाजारात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे गल्लीबोळातल्या मोकळ्या जागेतही कचरा साचलेला आहे. कचरा जाळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यावरही कारवाईसाठी पथक नियुक्त करण्यात आले आहेत; पण त्याआगोदर घरोघरी निर्माण होणारा कचरा नियमित उचलणे आवश्यक आहे.

आठ दिवसांत कचरा उचलण्याचे निर्देशशहरातला कचरा संकलन करताना अडचणी आल्या होत्या; मात्र आता त्या दूर झाल्या असून, संबंधित संस्थेला आठ दिवसांत कचरा उचलण्याचे निर्देश बैठक घेऊन देण्यात आले आहेत. कचरा व्यवस्थापनाबाबतचे निवडणुकीनंतर त्याबाबतची प्रक्रिया होऊ शकते. प्राप्त स्थितीत जुन्या संस्थेकडे कचरा व्यवस्थापनाचे काम आहे.- रमाकांत पिडगे, स्वच्छता विभागप्रमुख मनपा

आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन पूर्वपदावरआठ हजार रुपये वेतनावर काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. आमच्या काही मागण्या महानगरपालिका प्रशासनाकडे होत्या. त्यातील काही मागण्यांवर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. शहरात कचरा वाढलेला आहे. त्याबाबतचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जाईल. आठ दिवसांत कचरा व्यवस्थापन पूर्वपदावर येईल.- संजय कांबळे, जनाधार संस्था, लातूर

टॅग्स :laturलातूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिका