शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठोकमध्ये टोमॅटो तीन रुपये किलो, भाव घसरल्याने तोंडणी बंद; शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात

By संदीप शिंदे | Updated: October 10, 2023 17:59 IST

कमी भाव मिळू लागल्याने टोमॅटोचा उत्पादन खर्च निघणे दूरच, साधा वाहतूक खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे.

चाकूर ( लातूर) : तालुक्यात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर घसरले आहेत. ठोकमध्ये तीन ते चार रुपये किलो दराने टोमॅटोला भाव मिळत असून, तोडणीसाठीची मजुरी आणि बाजारात नेणे याचाही खर्च निघत नसल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणीच थांबविली आहे. पुन्हा एकदा दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

लाल टोमॅटो बाजारात १० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तरी त्याला मागणी अधिक नसल्याने टोमॅटो काढणीसाठी सध्या मजूर हजेरी जास्त मागत आहेत. ती देऊन टोमॅटो काढून विक्रीसाठी आणणे शेतकरी वर्गाला परवडत नाही. यामुळे शेतकरी टोमॅटो काढून बांधावर फेकून देत आहे. काही दिवस टोमॅटोला भाव चांगले होते. त्यामुळे नगदीचे पीक म्हणून शेतकरी टोमॅटोकडे वळला. चाकूरसह तालुक्यातील वडवळ नागनाथ, लातूररोड, मोहनाळ, सावरगाव, कडमुळी, भाटसांगावी या गावच्या शिवारात टोमॅटोची सुमारे ११०० एकरवर लागवड आहे.

जून ते ऑगस्टमध्ये याची लागवड केली जाते. सध्या टोमॅटो तोडणीला आले आहेत. या भागातील टोमॅटो सध्या नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, हैदराबाद, आदिलाबाद, निजामाबाद या भागांत शेतकरी विक्रीसाठी नेतात. ३० किलोच्या क्रेटला ८० ते १२० पर्यंत भाव मिळत आहेत. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास निव्वळ विक्रीतून चार पैसे मिळणार असताना बाजारात टोमॅटोचे भाव गडगडले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. टोमॅटो तोडणीसाठी मजूर मिळेना, त्यातच वाहतूक करून मार्केटला नेण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणी थांबविली आहे. त्यातच सप्टेंबर महिन्यात पुन्हा सुमारे ६०० एकर टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

उत्पादन खर्च दूरच, वाहतूक खर्चही निघेना...कमी भाव मिळू लागल्याने टोमॅटोचा उत्पादन खर्च निघणे दूरच, साधा वाहतूक खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे. यावर्षी टोमॅटोला चांगला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात टोमॅटोची लागवड केली. भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यातच थोडाफार प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. आता जगावे कसा, असा प्रश्न आमच्यासमाेर पडला असल्याचे शेतकरी संग्राम मुंडे यांनी सांगितले.

उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा...शेतीमाल काढण्यासाठी लागणारा खर्च आणि त्यातून काढलेल्या उत्पन्नाचा हिशोब केला तर उरलेल्या पैशातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. शासनाने उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे गरजेचे आहे. चाकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. दर वाढले होते तेव्हा सोशल मीडियावर चर्चा होते. आता दर कमी झाले तर कोणीच बोलायला तयार नाही. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी नागनाथ पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र