शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

ठोकमध्ये टोमॅटो तीन रुपये किलो, भाव घसरल्याने तोंडणी बंद; शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात

By संदीप शिंदे | Updated: October 10, 2023 17:59 IST

कमी भाव मिळू लागल्याने टोमॅटोचा उत्पादन खर्च निघणे दूरच, साधा वाहतूक खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे.

चाकूर ( लातूर) : तालुक्यात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर घसरले आहेत. ठोकमध्ये तीन ते चार रुपये किलो दराने टोमॅटोला भाव मिळत असून, तोडणीसाठीची मजुरी आणि बाजारात नेणे याचाही खर्च निघत नसल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणीच थांबविली आहे. पुन्हा एकदा दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

लाल टोमॅटो बाजारात १० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तरी त्याला मागणी अधिक नसल्याने टोमॅटो काढणीसाठी सध्या मजूर हजेरी जास्त मागत आहेत. ती देऊन टोमॅटो काढून विक्रीसाठी आणणे शेतकरी वर्गाला परवडत नाही. यामुळे शेतकरी टोमॅटो काढून बांधावर फेकून देत आहे. काही दिवस टोमॅटोला भाव चांगले होते. त्यामुळे नगदीचे पीक म्हणून शेतकरी टोमॅटोकडे वळला. चाकूरसह तालुक्यातील वडवळ नागनाथ, लातूररोड, मोहनाळ, सावरगाव, कडमुळी, भाटसांगावी या गावच्या शिवारात टोमॅटोची सुमारे ११०० एकरवर लागवड आहे.

जून ते ऑगस्टमध्ये याची लागवड केली जाते. सध्या टोमॅटो तोडणीला आले आहेत. या भागातील टोमॅटो सध्या नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, हैदराबाद, आदिलाबाद, निजामाबाद या भागांत शेतकरी विक्रीसाठी नेतात. ३० किलोच्या क्रेटला ८० ते १२० पर्यंत भाव मिळत आहेत. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास निव्वळ विक्रीतून चार पैसे मिळणार असताना बाजारात टोमॅटोचे भाव गडगडले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. टोमॅटो तोडणीसाठी मजूर मिळेना, त्यातच वाहतूक करून मार्केटला नेण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणी थांबविली आहे. त्यातच सप्टेंबर महिन्यात पुन्हा सुमारे ६०० एकर टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.

उत्पादन खर्च दूरच, वाहतूक खर्चही निघेना...कमी भाव मिळू लागल्याने टोमॅटोचा उत्पादन खर्च निघणे दूरच, साधा वाहतूक खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे. यावर्षी टोमॅटोला चांगला भाव होता म्हणून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात टोमॅटोची लागवड केली. भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यातच थोडाफार प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. आता जगावे कसा, असा प्रश्न आमच्यासमाेर पडला असल्याचे शेतकरी संग्राम मुंडे यांनी सांगितले.

उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा...शेतीमाल काढण्यासाठी लागणारा खर्च आणि त्यातून काढलेल्या उत्पन्नाचा हिशोब केला तर उरलेल्या पैशातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे. शासनाने उत्पादन खर्चावर आधारित भाव देणे गरजेचे आहे. चाकूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. दर वाढले होते तेव्हा सोशल मीडियावर चर्चा होते. आता दर कमी झाले तर कोणीच बोलायला तयार नाही. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी नागनाथ पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र