शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

निलंग्यात चोरट्यांचा धुमाकूळ, पुन्हा सहा दुकानं फोडली 

By हरी मोकाशे | Updated: September 15, 2023 00:51 IST

येथे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

लातूर :  निलंगा शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत शहरातील सहा दुकाने फोडून साहित्यासह रोख रक्कम पळविल्याची घटना घडली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

शहरात गेल्या दोन- तीन दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटेच्या सुमारास अनय ट्रेडिंग दुकानाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह एक लाखाचे साहित्य पळविले. तसेच रामलिंगेश्वर फर्टिलायझर व सुंदर किराणा स्टोअर्सच्या दुकानाचा पत्रा उचलून आतमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.

दरम्यान, बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेपर्यंतच्या वेळेत शहरातील हनुमान किराणा स्टोअर्स फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील जवळपास १० हजारांचे किराणा साहित्य पळविले. तसेच शेजारी असलेल्या बालाजी ट्रेडर्स या दुकानातील ५०० ते ६०० रुपयांची चिल्लर पळविली. त्याचबरोबर गजानन फर्टिलायझर या दुकानातील साडेतीन हजार रुपयांचे औषध चोरट्यांनी पळविले.

योगीराज लाईट सेंटर फोडले. मात्र, त्यात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. पाटील हार्डवेअर या दुकानातील ३ हजार रुपयांची चिल्लर पळविली. या दुकानाशेजारील अवनी मोबाईल शॉपीमध्येही चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. दोन दिवसांच्या कालावधीत चोरट्यांनी ९ दुकाने फोडल्याच्या घडल्या आहेत. यात जवळपास दीड लाख पळविले आहे. चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष तानाजी माकणीकर यांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोरRobberyचोरी