शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

मोठे सामाजिक परिवर्तन, लातुरातील भोई समाजाने केली जात पंचायत बरखास्त

By राजकुमार जोंधळे | Updated: September 3, 2022 14:28 IST

जात पंचायतच्या पंचांनी दिले शंभरच्या बॉण्डवर शपथपत्र; पोलीस आणि अंनिसच्या प्रबोधनाला आले यश

लातूर : शहरातील भोई समाजाने घेलेल्या परिवर्तनवादी निर्णयाने बदल घडविला आहे. यापुढे जातपंचायतच अस्तित्वात राहणार नाही. शिवाय, वाद-विवाद आणि भांडण-तंटा हा सनदशीर, कयद्याच्या चौकटीत राहून सोडविला जाणार आहे, असे शनिवारी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले. 

दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे शंभर रुपयाच्या बॉण्डवर शपथपत्र सादर करत बरखस्तीचा पुरोगामी निर्णय जाहीर केला आहे. पोलीस व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर शाखेच्या प्रबोधनाला यश आले आहे. लातुरातील भोई समाजात पारंपरिक पद्धतीने जात पंचायतच्या माध्यमातून न्याय निवडा केला जात होता. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर कायदा अस्तित्वात असतानाही जात पंचयतीतच न्याय निवडा केला जात होता. दोन्ही वादी-प्रतिवादी बाजूच्या पंचाच्या सहमतीने निवाडा केला जात होता.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एका प्रकरणात जातपंचयतीच्या पंचावरच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव वावगे यांनी संपर्क साधला. जातपंचयत आणि कायदेशीर बाजू याबवत त्यांनी सतत प्रबोधन केले. यातून आपण करत असलेले काम हे बेकायदेशीर असल्याची जाणीव पंचाना झाली. समाजातील पंचाची एक व्यापक बैठक झाली. याच बैठकीत भोई समाज जात पंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

याबाबतचा निर्णय समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना १०० रुपयाच्या बॉण्डवर शपथपत्र सादर करण्यात आले आहे. यावर समाजातील नागनाथ गवते, सुग्रीव गवते, बालाजी गवळी, दत्ता गवळी,तुकाराम मोरे, दिगंबर मोरे, सचिन गवळी, लक्ष्मण मोरे, लखन काजळे, सहदेव मोरे, देविदास खरटमल, योगेश गवळी, कृष्णा घेणे, अशोक मोरे आदींसह ७६ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

यांनी घेतला पुढाकार...भोई समाजात पारंपरिक पद्धतीने जात पंचयतीच्या माध्यमातून होणारा न्याय निवडा हा बेकायदेशीर आहे. यातून समाजातील व्यक्तीला बहिष्कृत करणे, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करणे असे प्रकार घडतात. यातूनच न्याय मागणाऱ्याचा छळ होतो. हे रोखण्यासाठी अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव वावगे, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पुढाकार घेत समाजात हा बदल घडविला आहे.

टॅग्स :laturलातूरSocialसामाजिक