शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

मोठे सामाजिक परिवर्तन, लातुरातील भोई समाजाने केली जात पंचायत बरखास्त

By राजकुमार जोंधळे | Updated: September 3, 2022 14:28 IST

जात पंचायतच्या पंचांनी दिले शंभरच्या बॉण्डवर शपथपत्र; पोलीस आणि अंनिसच्या प्रबोधनाला आले यश

लातूर : शहरातील भोई समाजाने घेलेल्या परिवर्तनवादी निर्णयाने बदल घडविला आहे. यापुढे जातपंचायतच अस्तित्वात राहणार नाही. शिवाय, वाद-विवाद आणि भांडण-तंटा हा सनदशीर, कयद्याच्या चौकटीत राहून सोडविला जाणार आहे, असे शनिवारी समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले. 

दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे शंभर रुपयाच्या बॉण्डवर शपथपत्र सादर करत बरखस्तीचा पुरोगामी निर्णय जाहीर केला आहे. पोलीस व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूर शाखेच्या प्रबोधनाला यश आले आहे. लातुरातील भोई समाजात पारंपरिक पद्धतीने जात पंचायतच्या माध्यमातून न्याय निवडा केला जात होता. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर कायदा अस्तित्वात असतानाही जात पंचयतीतच न्याय निवडा केला जात होता. दोन्ही वादी-प्रतिवादी बाजूच्या पंचाच्या सहमतीने निवाडा केला जात होता.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एका प्रकरणात जातपंचयतीच्या पंचावरच गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव वावगे यांनी संपर्क साधला. जातपंचयत आणि कायदेशीर बाजू याबवत त्यांनी सतत प्रबोधन केले. यातून आपण करत असलेले काम हे बेकायदेशीर असल्याची जाणीव पंचाना झाली. समाजातील पंचाची एक व्यापक बैठक झाली. याच बैठकीत भोई समाज जात पंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

याबाबतचा निर्णय समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना १०० रुपयाच्या बॉण्डवर शपथपत्र सादर करण्यात आले आहे. यावर समाजातील नागनाथ गवते, सुग्रीव गवते, बालाजी गवळी, दत्ता गवळी,तुकाराम मोरे, दिगंबर मोरे, सचिन गवळी, लक्ष्मण मोरे, लखन काजळे, सहदेव मोरे, देविदास खरटमल, योगेश गवळी, कृष्णा घेणे, अशोक मोरे आदींसह ७६ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

यांनी घेतला पुढाकार...भोई समाजात पारंपरिक पद्धतीने जात पंचयतीच्या माध्यमातून होणारा न्याय निवडा हा बेकायदेशीर आहे. यातून समाजातील व्यक्तीला बहिष्कृत करणे, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करणे असे प्रकार घडतात. यातूनच न्याय मागणाऱ्याचा छळ होतो. हे रोखण्यासाठी अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव वावगे, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पुढाकार घेत समाजात हा बदल घडविला आहे.

टॅग्स :laturलातूरSocialसामाजिक