शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maratha Reservation: आरक्षणासाठी शिक्षकाची आत्महत्या, ह्रदय पिळवटून टाकणारे शेवटचं पत्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 16:30 IST

मुलाला शिक्षण देऊनही त्यास नोकरी मिळत नाही, मुलगी एमएस्सीला विद्यापीठात दुसरी आली, तिलाही कुठे संधी मिळत नाही. आता...

लातूर : मुलाला शिक्षण देऊनही त्यास नोकरी मिळत नाही, मुलगी एमएस्सीला विद्यापीठात दुसरी आली, तिलाही कुठे संधी मिळत नाही. त्यामुळे निराश झालेल्या लातूर जिल्ह्यातील माटेफळ येथील एका शिक्षकाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रमेश पाटील असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट ह्रदय पिळवून टाकणारी आहे.

लातूर तालुक्यातील माटेफळ येथील शिक्षक रमेश ज्ञानोबा पाटील हे निवळी येथील एका संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. एक मुलगी एमएसस्सी तर दुसऱ्या मुलीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. मुलगाही पदवीधर असून, तो सध्या स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. त्यांना दहा एकर शेती असून त्यावर राष्ट्रीयकृत बँक आणि सहाकारी बँकेचे 3 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज आहे. कर्जाची परतफेड होत नाही. आरक्षण नसल्याने मुलांनाही नोकरी मिळत नसल्याचे कारण मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पाटील यांनी नमूद केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून, याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

नैराश्यातून आत्महत्यामुलाला चांगले शिक्षण दिले. शिक्षणावर मोठा खर्च करुनही नोकरी मिळत नाही. तसेच मराठा आरक्षणबद्दल सरकार चालढकल करत असल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. यातूनच त्यांच्यात नैराश्य आले होते. मुलाचे काय होणार? ही चिंता त्यांना सतावत होती. हा ताण सहन न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

पत्नीला पेन्शन मंजूर करावीकुठलीही संधी न मिळाल्याने उच्चशिक्षित मुले घरीच आहेत. माझ्या पगारावर घरप्रपंचही चालत नाही. त्यामुळे खासगी कर्ज काढण्याची वेळ माझ्यावर आली आणि त्यातून मी कर्जबाजारी झालो. माझ्या पश्चात प्रपंचासाठी पत्नीला लवकर पेन्शन मंजूर करावी असेही रमेश पाटील यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSuicideआत्महत्या