शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

लातूर जिल्ह्यात अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी धडक कारवाई; ५९ विद्युत पंप, ६१ स्टार्टर जप्त

By हणमंत गायकवाड | Updated: May 24, 2024 20:06 IST

मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ०.६०७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ०.३४ आहे.

लातूर : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक यांची पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत ५९ विद्युत पंप, १६१ स्टार्टर्स, १२३ बंडल वायर आदी साहित्य जप्त केले आहे. तसेच ८७६ वीजजोडण्या तोडण्यात आल्या  आहेत.

पाणीटंचाई निवारणार्थ जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहे. तरीही नागरिकांच्या पाणीटंचाईच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास त्याचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन तयार करण्यात आला आहे. ०२३८२-२२०२०४  हा या कक्षाचा संपर्क क्रमांक असून नागरिकांना आपली तक्रार या क्रमांकावर नोंदविता येणार आहे. या कक्षामार्फत संबंधित विभागाशी समन्वय करून या तक्रारींचा निपटारा केला जाईल.

मांजरा प्रकल्प ०.३४ टक्के जिवंत साठामांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ०.६०७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ०.३४ आहे. मृत आणि जिवंत मिळून एकूण पाणीसाठा ४७.७३७ दलघमी पाणी आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर केला तर सप्टेंबरपर्यंत पुरू शकते.

गाळ काढण्याची मोहिमे गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे मांजरा प्रकल्पात यंदा पाणी वाढण्याची शक्यता सध्या जिल्ह्यातील धरणातून गाळ काढण्याची मोहीम राबविली जात आहे. गाळमुक्त धरण हे अभियान राबविले जात आहे. त्यानुसार मांजरा प्रकल्पातीलही गाळ काढण्याची मोहीम आहे. आतापर्यंत १.६५ लाख घनमीटर गाळ या प्रकल्पातील काढण्यात आला असल्याची माहिती शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली. दोन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना हा गाळ अनुदानावर देण्याची मोहीम आहे. ३७ हजार ५०० रुपये हेक्टरी अनुदान गाळ टाकल्यानंतर आहे. वाहतुकीचा खर्च निघावा, असा हेतू यामागे आहे. त्यानुसार मांजरा प्रकल्पातून काढलेला गाळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी घेऊन गेला आहे. धरणातील गाळ शेतात टाकल्यामुळे दुप्पट सुपिकता वाढते. त्यामुळे गाळ घेऊन जाण्याला परिसरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे. मांजरा प्रकल्पाकडे ज्या शेतकऱ्यांनी गाळ नेला आहे, त्या शेतकऱ्यांचा शेती गट नंबर तसेच किती गाळ नेला, याची नोंद आहे. त्यानुसार शासनाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला जातो, अशीही माहिती शाखाधिकाऱ्यांनी दिली.

मांजरा प्रकल्पात मोठा गाळमांजरा प्रकल्पात १६.२२७ दलघमी गाळ साठला आहे. त्यामुळे ८.४१२ टक्के संचयी पाण्याचे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी सध्या गाळ काढण्याची मोहीम राबविली जात आहे. गाळामुळे जमिनीचा पोत सुधारतो, शिवाय धरणामध्येही पाण्याची साठवण क्षमता वाढते. गेल्या ४१ वर्षांत मोठ्या प्रमाणात धरणात गाळ साचलेला आहे. हा गाळ काढला तर पाण्याचे नुकसान होणार नाही.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर