शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

दुष्काळी अनुदान, पीकविम्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयामध्ये ठिय्या

By हरी मोकाशे | Updated: May 31, 2024 20:05 IST

रेणापुरात शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन

रेणापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान आणि पीकविमा देण्यात यावा. सर्व कारखान्यांनी ऊसाला ३ हजार १०० रुपये प्रति टन भाव देवून त्यानुसार बिल अदा करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केल्यामुळे पीकविमा लागू करावा. केवायसीविना अनुदान वाटप करावे. मागील वर्षीचे अनुदान जमा झाले नाही. त्याची माहिती द्यावी. तलाठ्यांनी गावोगावी जाऊन ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही, अशा खातेदारांची यादी तयार करावी आणि अनुदान तात्काळ वाटप करावे. तालुक्यातील किती शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्याची माहिती द्यावी. केवायसीचा प्रश्न सोडविण्यासाठी बँकेसोबत शेतकरी संघटनेची बैठक घेण्यात यावी. सर्व कारखान्यांनी ऊसाला ३ हजार १०० रूपयांप्रमाणे भाव द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब भंडारे, संपर्कप्रमुख दत्ता शिंगडे, तालुका उपाध्यक्ष अच्युत मुळे, शेतकरी गोविंद माने, खलंग्रीचे उपसरपंच ज्ञानोबा वाघमारे, दिलीप बोकडे, सोपानराव लहाने, अशोक आगरकर, ज्ञानोबा काळे, निशांत देशमुख, अरविंद घाडगे, विठ्ठल येलाले, तुकाराम येलाले, प्रशांत गाडगे, ईश्वर बंडापल्ले यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या १० जून रोजी रेणापूर तहसील कार्यालयास टाळे ठोकून रेणापूर- पिंपळफाटा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सेनेचे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी दिला आहे.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन