शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उदगीरातील 'श्रीलंका' धडकनाळ-बोरगावला पडला पुन्हा पुराचा वेढा, ग्रामस्थांनी रात्र जागून काढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:02 IST

उदगीर तालुक्यातील लातूर रोड  वगळता सर्व मार्गावरील पूल पाण्याखाली जाऊन बंद पडले आहेत.

- व्ही. एस. कुलकर्णीउदगीर ( लातूर) : बुधवारी रात्री पासून सुरू झालेल्या धुवांधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील 'श्रीलंका' म्हणून ओळख असलेल्या धडकनाळ आणि बोरगाव या दोन्ही गावांना पुराचा वेढा पडला आहे. जोरदार पाऊस सुरूच राहून पाण्याची पातळी वाढत गेल्याने बुधवारची रात्र गावकर्‍यांनी जागून काढली. दरम्यान, उदगीर तालुक्यातील लातूर रोड  वगळता सर्व मार्गावरील पूल पाण्याखाली जाऊन बंद पडले आहेत.

दहा दिवसातच या गावांना दुसऱ्यांदा महापुराचा मोठा फटका बसला आहे. लेंडी नदीची उपनदी असलेल्या नदीला महापूर आल्याने या नदीचे पाणी धडकनाळ आणि बोरगावात शिरले. उदगीर देगलूर बोरगाव रस्त्यावरील पुलावरुन पाणी जात असल्याने या गावचा संपर्क तुटला आहे. सकाळपासून पुराचे पाणी वाढत आहे. त्यामुळे गावातील घरांमध्ये पाणी शिरत आहे.  गावकर्‍यांनी वेळीच जनावरे व घरातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविले आहे.

१० दिवसात दुसऱ्यांदा शिरले गावात पाणी!१८ ऑगस्टला पुराचा महाप्रलय धडकनाळ बोरगावात आला होता. या प्रलयात गावासह गावातील पशुधन, शेतीचे मोठे नुकसान झाले होते. पुराने शेतीतील फक्त  खडे शिल्लक ठेवले होते. पिके व पशुधन पुरात वाहून गेले होते. ४०० हेक्टर जमिनीचे नुकसान व २२० पशुधन वाहून गेले होते. या गावांचे जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे पुन्हा  जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसर्‍यांदा गावात पुराचे पाणी शिरल्याने गावच्या पुनर्वसनाची  मागणी जोर धरत आहे.

माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी केली पाहणीमाजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी लंडनचा दौरा करून परत येताच प्रशासनातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पूरग्रस्त धडकनाळ -बोरगाव भागातील नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून गावांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर मार्ग वगळता तालुक्यातील सर्व मार्ग बंद!गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे एकमेव लातूर मार्ग सुरू होता. सर्व मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे तालुक्यातील सर्व मार्ग बंद होते.

तिरु, देवर्जनसह सर्व तलाव ओहरफ्लो!तालुक्यातील तिरु व देवर्जन हे दोन मोठे मध्यम प्रकल्प असून, हे दोन्ही प्रकल्प पाण्याने ओसंडून वाहत आहे. शिवाय तालुक्यातील लघु व साठवण तलावही ओसंडून वाहत आहेत. तिरुचे सर्व दरवाजे खुले करण्यात आल्यामुळे तिरु नदीला महापूर आला आहे. तालुक्यातील गावाजवळून वाहणाऱ्या नदी-नाल्यांना पूर येवून सर्वच पुलावरून पाणी जात असल्यामुळे तालुक्यातील सर्व मार्ग गुरुवारी बंद होते. गुरुवारी दिवसभर पाण्याची संततधार सुरूच होती. दिवसभर सूर्यदर्शन झालेच नाही.

टॅग्स :laturलातूरRainपाऊसfloodपूर