शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पीक धोक्यात; गोगलगायींच्या उपद्रवातून वाचले; पण हिरव्या अळयांकडून पिके फस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 20:10 IST

शेतकरी त्रस्त, पावसाची रिपरिप चालू असल्याने मशागत पूर्ण होत नाही, असे चित्र आहे.

लातूर : सोयाबीन उत्पादक शेतकरी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत सापडलेला दिसून येत आहे. गतवर्षी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त होते. तर यंदा पान खाणाऱ्या हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. त्यातच पावसाची रिपरिप चालू असल्याने मशागत पूर्ण होत नाही, असे चित्र आहे. यामुळे सोयाबीन पिवळे पडत असून, अळ्या पिके फस्त करीत आहेत.

महाराष्ट्रात लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातोय. एकूण खरीप क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात आहे. पाच लाख हेक्टरवर यंदा सोयाबीनची पेरणी झालेली आहे. वेळेत पाऊस पडल्यामुळे आणि वेळेत पेरण्या झाल्यामुळे सोयाबीन बहरले आहे. पण त्यावर हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. फवारणी करावी तर पावसाची रिपरिप आहे. पूर्ण मशागत होत नाही. त्यामुळे अळ्यांचा नायनाट होत नाही, अशा अडचणीत सोयाबीनचे पीक आले आहे.

पेरणीनंतर पावसाची रिपरिप सुरूचपेरणीनंतर जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. पिकांची वाढ चांगली झाली. सतत रिमझिम पाऊस पाऊस होत असल्याने काही ठिकाणी पिके पिवळी पडू लागली आहेत. तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकावर हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४७० मिमी पाऊस झाला आहे. अनेक शेतात सध्या वापस नाही. त्यामुळे पिके पिवळी पडत आहेत. परिणामी, फवारणी करता येत नसल्यामुळे हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हिरव्या अळ्या यंदा सोयाबीन पिकावर परिणाम करतील, असे शेतकरी बोलत आहेत.

कीटकनाशकाचा पुरवठा करणे आवश्यककृषी विभागाने गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मेटाल्डीहाईट कीटकनाशक पुरवठा केला होता. तसेच नॅनो युरिया, नॅनो डीएपी दिले होते. आता अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी कृषी विभागाकडे केली आहे.

फवारणी पंप देण्याची घोषणा हवेतचपिकांवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना फवारणी पंप देण्यासाठी घोषणा केली होती. अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. काही जणांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. फवारणी पंप देण्याची योजना हवेतच विरली आहे. सरसकट सर्वच शेतकऱ्यांना पंप देण्याची आवश्यकता होती. अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता या पंपाची मदत झाली असती. 

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र