शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सोयाबीन पीक धोक्यात; गोगलगायींच्या उपद्रवातून वाचले; पण हिरव्या अळयांकडून पिके फस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 20:10 IST

शेतकरी त्रस्त, पावसाची रिपरिप चालू असल्याने मशागत पूर्ण होत नाही, असे चित्र आहे.

लातूर : सोयाबीन उत्पादक शेतकरी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत सापडलेला दिसून येत आहे. गतवर्षी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त होते. तर यंदा पान खाणाऱ्या हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. त्यातच पावसाची रिपरिप चालू असल्याने मशागत पूर्ण होत नाही, असे चित्र आहे. यामुळे सोयाबीन पिवळे पडत असून, अळ्या पिके फस्त करीत आहेत.

महाराष्ट्रात लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातोय. एकूण खरीप क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात आहे. पाच लाख हेक्टरवर यंदा सोयाबीनची पेरणी झालेली आहे. वेळेत पाऊस पडल्यामुळे आणि वेळेत पेरण्या झाल्यामुळे सोयाबीन बहरले आहे. पण त्यावर हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. फवारणी करावी तर पावसाची रिपरिप आहे. पूर्ण मशागत होत नाही. त्यामुळे अळ्यांचा नायनाट होत नाही, अशा अडचणीत सोयाबीनचे पीक आले आहे.

पेरणीनंतर पावसाची रिपरिप सुरूचपेरणीनंतर जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. पिकांची वाढ चांगली झाली. सतत रिमझिम पाऊस पाऊस होत असल्याने काही ठिकाणी पिके पिवळी पडू लागली आहेत. तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकावर हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४७० मिमी पाऊस झाला आहे. अनेक शेतात सध्या वापस नाही. त्यामुळे पिके पिवळी पडत आहेत. परिणामी, फवारणी करता येत नसल्यामुळे हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हिरव्या अळ्या यंदा सोयाबीन पिकावर परिणाम करतील, असे शेतकरी बोलत आहेत.

कीटकनाशकाचा पुरवठा करणे आवश्यककृषी विभागाने गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मेटाल्डीहाईट कीटकनाशक पुरवठा केला होता. तसेच नॅनो युरिया, नॅनो डीएपी दिले होते. आता अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी कृषी विभागाकडे केली आहे.

फवारणी पंप देण्याची घोषणा हवेतचपिकांवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना फवारणी पंप देण्यासाठी घोषणा केली होती. अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. काही जणांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. फवारणी पंप देण्याची योजना हवेतच विरली आहे. सरसकट सर्वच शेतकऱ्यांना पंप देण्याची आवश्यकता होती. अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता या पंपाची मदत झाली असती. 

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र